मुंबई: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली बघायला मिळाली आहे. मुंबईची तुंबई झाल्याने ठिकठिक पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडाली होती. महापालिकेत सत्ते असण्याऱ्या शिवसेनेला विरोधीपक्षाकडून चांगलचे धारेवर धरले असताना, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या एका विधानावरुन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. तसेच त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
राहुल शेवाळे यांनी मुंबईची तुंबई होण्याला केंद्र सरकारला जबाबदार धरल्यानंतर प्रविण दरेकरांनी त्यावर टोला लगावला आहे. ‘यांचं म्हणजे ना. नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना ओली लाकडं! स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आलं अंगावर की ढकललं केंद्रावर!’, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी ट्विटरवरून खोचक टीका केली आहे.
यांचं म्हणजे ना…
नाचता येईना अंगण वाकडं,
रांधता येईना ओली लाकडं!स्वतःचं अपयश झाकण्यासाठी,
"आलं अंगावर की, ढकललं केंद्रावर!" pic.twitter.com/rzM5OdyPWs— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 12, 2021
राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले होते –
केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्यानंतर हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात आहे. मात्र, ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकले नाही. त्यामुळे हिंदमाता परिसरात पाणी साचते असा आरोप शेवाळे यांनी केला होता.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल देखील ट्रॅक्सवर पाणी साचल्यामुळे काही काळ बंद ठेवावी लागल्यामुळे यावर मुंबईकरांची तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
Read Also :
- ‘संभाजीराजेंना मान्य नसले तरी ते भाजपचेच, कागदावर का होईना खासदार आहेत’
- ‘आगामी महापालिका, झेडपी, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूकही आम्ही स्वबळावर जिंकू’
- पवारांनी कितीही रणनीती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार – फडणवीस
- आमचा विश्वास लोकशाहीवर, राहुल गांधीच बनणार पंतप्रधान – नाना पटोले
- आणखी एक मंत्री मंत्रिमंडळातून जाणार? अनिल परबांच्या अडचणीत वाढ