पुणे : “बहोत हुई महंगाई की मार” अशा फुशारक्या मारत नरेंद्र मोदींचं भाजप सरकार सत्तेत आलं. सत्तेत येताच मोदीजींनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल आहे. त्यामुळे, महागाईने ग्रस्त जनतेच्या यातनांकडे दुर्लक्ष करून झोपेचं सोंग घेणाऱ्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यातल्या स्वारगेट चौकात हे आंदोलन करण्यात आलं. रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
…अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
केंद्र सरकारला सद्बुद्धी येण्यासाठी हे आंदोलन केलं. महागाईच्या विरोधात महिलांचा रोष आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झाला. केंद्र सरकारमुळे महिलांचे अर्थिक नियोजन कोलमडून गेलं आहे, सरकारला आता सुबुद्धी यावी, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. मी मोदी सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा त्यांनी यावेळी निषेध केला. यावेळी, शहराध्यक्ष प्रशात जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा!’ राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीची टीका
“बहोत हुई महंगाई की मार” अशा फुशारक्या मारत नरेंद्र मोदींचं भाजप सरकार सत्तेत आलं. सत्तेत येताच मोदीजींनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपल्या उद्योगपती मित्रांची तिजोरी भरण्याचं काम केलं. ६०-७० रुपये लीटर असलेलं पेट्रोल आज १०८ रुपये लीटर झालं आहे, ३५० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज ८५० रुपयांचा झाला आहे, ८०-९० रुपये लिटर मिळणारं खाद्यतेल आज २०० रुपये लिटर एवढं महाग झालं आहे. याची झळ मोदींच्या उद्योगपती मित्रांना नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला सोसावी लागत आहे. मोदी सरकारने मात्र जनतेच्या यातनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे, सरकारला झोपेतून जाग करणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
Read Also :
- भाजपच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची पोलखोल करणार; राष्ट्रवादीने दंड थोपटले
- न्यायासाठी संजीवनी काळेंनी ठोठावले ‘कृष्णकुंज’चे दरवाजे, घेतली शर्मिला ठाकरेंची भेट!
- लाच प्रकरण: सभापती नितीन लांडगे यांचा जामीन फेटाळला; राष्ट्रवादीचे ४ अन् शिवसेनेच्या २ नगरसेवकांची होणार चौकशी!
- …अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
- भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात; मुंबई पोलिसांकडून तब्बल ३६ गुन्हे दाखल