मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्व गेल्या 2 वर्षांपासून लढा देत आहोत. कोरोना रोखण्यासाठी मास्क हेच प्रमुख शस्त्र आहे. राज्यात आता कोरोनाचा जोर बऱ्याच प्रमाणात ओसरला आहे. अनेक निर्बंध हे शिथिलही करण्यात आले आहेत. मुंबईही फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत अनलॉक होण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता लवकरच राज्य मास्कमुक्त होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र मास्कमुक्त केव्हा होणार, या शक्यतेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा
“राज्य मास्कमुक्त अजिबात नाही. तशी चर्चाही नाही. उगीच अफवा पसरवू नका. जेव्हा मास्कमुक्त होण्याचा निर्णय घेऊ तेव्हा पत्रकार परिषद घेऊ”, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कमुक्तीच्या शक्यतेवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी आज सकाळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबईतील विकास कामांची पाहणी केली. यावेळेस त्यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली.
” तू योद्धा महान है ” नितेश राणेंच्या मुंबईतील बॅनरने शिवसेनेला पुन्हा डिवचले
या विकास कामाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. आदित्य ठाकरे यांच्या ‘मिशन मुंबई’ला अजित पवार यांनी 650 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे मुंबईत विकासकामं वेगानं सुरु आहे. या विकासकामांची दखल घेत अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचं कौतुकही केलं. तर दादर चैत्यभूमी येथील नवीन झालेल्या व्ह्युविंग डेकचीही पाहणी अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केली.
Read also:
- किरीट सोमय्यांच्या सत्काराला महापालिकेने परवानगी नाकारली; भाजप सत्कार करण्यावर ठाम
- संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर; आशिष शेलारांची राऊतांवर बोचरी टीका
- मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
- लढा एसटी विलिनीकरणाचा; अहवाल सादर करण्यास आठवडाभर मुदवाढ
- यापुढे सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; वैभव नाईकांचा राणेंना कडक शब्दात इशारा