मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर पोहचले आहेत, अशी बोचरी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. संजय राऊत एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीचा एकही नेता नाही असं शेलार यांनी म्हटलं आहे.
अमरावतीत आयुक्तांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी; आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल
तसंच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ याच असं आव्हानही आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. पण २०१४ ते २०२१ एका दिवसाआड, रोज भाजपच्या नेतृत्वावर बोलत आले, लिहित आले, रोज भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आलात, पण सात वर्षात तुमच्या मागे ईडी लागली नाही, आज तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतायत म्हणून ईडी मागे लागली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी
ज्या संजय राऊत यांनी महाविकास आघाडीसाठी लढले ते आज एकाएकी पडले आहेत, शिवसेनेचे नेते बोलत नाहीत, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांचे नेते त्यामुळे ते राऊत यांच्या बाजूने बोलत नाहीत, दुर्दैवाने ते एकटे पडले आहेत असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
‘पुढे चला मुंबई’; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅगलाईन ठरली
ज्या माणसाचा स्वतःचा पक्ष कोणता हे कळत नाही त्या संजय राऊत यांनी निष्पक्षपणाची गोष्ट करतायत असं सांगत आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निष्पक्षपातीपणे कारवाई केली होती का? नितेश राणेंवर कारवाई निष्पक्षपातीपणा आहे का? मुंबई आणि राज्यातील पोलीसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातोय हा पक्षपातीपणा आहे का? असे सवाल उपस्थित केले.
Read also:
- मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
- लढा एसटी विलिनीकरणाचा; अहवाल सादर करण्यास आठवडाभर मुदवाढ
- यापुढे सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; वैभव नाईकांचा राणेंना कडक शब्दात इशारा
- ” तू योद्धा महान है ” नितेश राणेंच्या मुंबईतील बॅनरने शिवसेनेला पुन्हा डिवचले
- जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा