मुंबई : एसटी कामगार-कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याविषयी विचार करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. अहवाल जवळपास तयार आहे. तो अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती शुक्रवारी राज्य सरकारने हायकोर्टात केली. ही विनंती मान्य करत हायकोर्टाने अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेक लोकांचा बीपी वाढेल; नितेश राणेंचा हल्लाबोल
आता याप्रकरणाची पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीला होणार आहे. समितीचा शिफारशींचा अहवाल आणि त्यावरील मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय असलेला अहवाल राज्य सरकारने १८ फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे द्यावा. २२ फेब्रुवारी रोजी सुनावणीच्या वेळी तो आमच्यासमोर ठेवावा, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिले.
नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यादरम्यान राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढही दिली होती. परंतु, एसटी कर्मचारी एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. उच्च न्यायालयाने विलिनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. ही समिती जो अहवाल देईल तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.
गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे – मोदी
राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही राज्यातील १०० एसटी स्थानकांचे काम रखडले आहे. तीन महिन्यांपासून एसटी संप सुरूच असल्याने प्रवास बेभरवसा झाला असतानाच प्रवाशांच्या थांब्याचे ठिकाण असलेल्या एसटी स्थानकांच्या देखभालीचा प्रश्नही तीव्र झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस स्थानके अत्याधुनिक करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. संबंधित वर्षांचा निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार कंत्राटदार नियुक्त करून कामे सुरू झाली. मात्र करोनामुळे ती रखडली. करोना पहिली लाट वगळता उर्वरित दोन्ही लाटांमध्ये विकास बांधकाम सुरू ठेवण्याची स्पष्ट सूचना सरकारने दिली होती. तरीही ही कामे रखडली आहेत.
Read also:
- यापुढे सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; वैभव नाईकांचा राणेंना कडक शब्दात इशारा
- ” तू योद्धा महान है ” नितेश राणेंच्या मुंबईतील बॅनरने शिवसेनेला पुन्हा डिवचले
- जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा
- ‘पुढे चला मुंबई’; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची टॅगलाईन ठरली
- ठाकरे-पवारांचा मुंबईत सकाळी सकाळी वजनदार दौरा; मिशन मुंबईची जोरदार तयारी