मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या गटातील नेत्यांमधील राजकीय संघर्ष अजूनही सुरूच आहे. यातच मुंबईतील सिमेंटकाॅंक्रीट रस्त्यांच्या कामात कोरोडो रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. या कामासाठी विशिष्ट कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे कामे देण्यात आली. तसेच महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना कंत्राटे देऊन मुंबई महापालिका लुटत असल्याची टिकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट
रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण करताना आर्थिक घोटाळा तर होत आहेच पण वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. असं म्हणत नगरसेवक, लोकप्रतिनीधी नसताना 400 किमी रस्ते बनवायला कोणी सांगितले. असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मी प्रत्येक पक्षाला विचारत आहे, ज्यांनी महापालिकेमध्ये काम केलं आहे. त्यांना सध्या जे महापालिकेमध्ये चालू आहे ते पटतंय का? राजकारण बाजूला ठेवून वैयक्तिकरित्या स्वत:तच मत मांडावं असंही त्यांनी आव्हान केलं आहे.
“सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी नसताना 400 किमी रस्त्यांच्या 6000 कोटींच्या कामाचा निर्णय प्रशासक कसे घेऊ शकतात. गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका. कंत्राटदारांच्या निविदा पाहिल्या तर सगळं ठरवून झाल्याचं सिद्ध होत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबईकर म्हणून विचार करा, मुंबईकरांच्या पैशांचा गैरवापर होत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय
दरम्यान, मुंबई खड्डेमुक्त झाली, चांगले दवाखाने मिळाले, सौंदर्यीकरण होऊन मुंबईकरांचे जीवन बदलले, तर आपले काय होणार, या भीतीने आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झाली आहे. आम्ही काहीही केले तरी आदित्य ठाकरे यांना टिका करायची सवयच झाली आहे. कोणी काही चांगले काम करीत असेल तर त्याची पोटदुखी होण्याचे कारणच नाही. असा टोला दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
Read also
- “केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा”; राष्ट्रवादीने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुनावलं
- “अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”
- “सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा अन् एक मुलगी एवढ्यावरच थांब” अजित पवार
- “उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”
- “…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”