मुंबई : आगामी वर्षाकरीता केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पाचवे बजेट आहे. यातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. यावरून राष्ट्रवादीने त्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
“सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त
मी स्वत : मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे मध्यमवर्गींना होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. गेल्या काही वर्षात आम्ही मध्यमवर्गीयांवर कोणतेही नवीन कर लादलेले नाहीत. टॅक्स स्लॅलमध्येही बदल करण्यात आले नाहीत. 5 लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न पुर्णत: करमुक्त आहे. आम्ही देशातील 27 शहरांमध्ये मेट्रोचे निर्माण केले आहे. मध्यमवर्गीयांना त्याचा मोठा फायदा होतो आहे. तसेच ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर होत आहे. त्यामुळे आम्ही 100 स्मार्ट सिटीचे निर्माण करतोय. यासाठी निधीही देण्यात आला आहे. देशातील मध्यमवर्गीय जनतेसाठी जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया निर्मला सितारमण यांनी एका मुलाखतीत दिली आहे.
“बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय
निर्मला सितारमण यांच्या टिप्पणीवर राष्ट्रवादीने चिमटा काढला आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी एका मुलाखतीत मी मध्यमवर्गीयच आहे, मध्यमवर्गीयांच्या त्रासाची मला कल्पना आहे असे मत मांडले आहे. या मतातून त्यांना मध्यमवर्गीयांची थट्टा केली असं म्हणणे चुकीचे नाही. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीयांची पिळवणुक होत आहे. वाढते गॅस, इंधन, वीज दर याचा परिणाम हा मध्यमवर्गीयांच्या खिशावर होत आहे.
“सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका
याची कल्पना अर्थमंत्र्यांना नाही. केवळ मुलाखतीकरीता त्यांनी हे वक्तव्य केले असेल तर ती देशातील तमाम मध्यमवर्गीयांची थट्टाच म्हणावी लागेल. दोन वेळचे जेवण करण्यासाठी गॅस सिलेंडरला एक हजार रूपये मोजावे लागतात. तेव्हा वाढती महागाई मध्यमवर्गींयाच्या पोटाला चिमटा काढते. हे अर्थमंत्र्यांच्या कल्पनेपलीकडे आहे. त्यामुळे केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा. तर जनता तुमच्या विधानांवर विश्वास ठेवेल. असा टोला राष्ट्रवादीने सितारमण यांना लगावला आहे.
Read also
- “अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”
- “सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा अन् एक मुलगी एवढ्यावरच थांब” अजित पवार
- “उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”
- “…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”
- मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट