मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात कायमच शाब्दिक चकमक बघायला मिळतेय. दोन्ही नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता मातोश्रीच्या माळ्यावर काय काय पोहोचवलं ते लवकरच जाहीर करणार असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
आज शिवसेनेची काय अवस्था झाली आहे. सेनेचे 40 आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेसोबत निघून जातात. शिवसैनिक उघड्या डोळ्याने पाहत बसले. उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात. शिवसेना रडणारी कधीच नव्हती. त्याला शिवसेना नाही म्हणत. शिवसेना ही लढणारी होती. आता कुठे गेलं तुमचं सळसळतं रक्त? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांना नारायण राणे यांनी केला आहे.
“गिरीश महाजांनाना ते क्रेडीट घेण्याची गरज नाही”; बंडखोर आमदारांचा गिरीश महाजनांना टोला
त्याचबरोबर दोन्ही हात सावरून घोषणा देत होतात, आता कुठे गेल्या तुमच्या घोषणा. तुम्ही दुसऱ्यांना खोके म्हणतात. तुम्ही खोके नाही घेतले का? आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? उद्धव ठाकरे सांगेल त्यादिवशी मी जाहीर करेल की, मातोश्रीच्या माळ्यावर पोहोचवलं ते. असंही ते म्हणाले.
Read also
- “…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”
- मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट
- “सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त
- “बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय
- “सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका