सांगली : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील काही भागांचे मोठे नुकसान झाले होते. या वादळाचा फटका गुजरातला देखील बसला. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा हवाई दौरा करत मदत जाहीर केली होती. मात्र महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता यावर पुन्हा एकदा उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाष्य करत नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या कमिटीने केवळ जेवणावर ताव मारला, असे म्हणत निशाणा साधला आहे.
उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला 252 कोटींची मदत जाहीर केली. त्यानंतर 15 दिवसांनी केंद्राची कमिटी आली. पण कमिटीने जेवणावर ताव मारला. आता ते नदीतले मासे खायला आले की समुद्रातील, हे मला माहित नाही, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्र सरकारने तौक्तेमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 252 कोटींचे पॅकेज दिले. केंद्र सरकारने देखील तशीच मदत करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात आले नाहीत. महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार नसल्याने मोदी आले नसतील, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधानांनी गुजरातला 1 हजार कोटींची मदत केली. त्यातील 500 कोटी महाराष्ट्रला मदत केली असती तर आम्ही धन्य झालो असतो, असे सामंत म्हणाले. मदतीबाबतचे केंद्राचे निकष देखील वेगळे असल्याचे सामंत यांनी सांगितले.
Read Also :
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींनी मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली’
- ‘पवारांच्या ड्रावरमधून पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी अजितदादांबरोबर भाजपची कोण-कोण लोकं होती?’
- ‘महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, काय दिवे लावले या कर्मदरिद्री सरकारने?’
- पंतप्रधानांची मोफत लसीकरणाची घोषणा; राहुल गांधींनी विचारला ‘हा’ साधा प्रश्न