मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाबाबत नार्वेकरांनी ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवलं आहे. तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निवाळाही त्यांनी दिला. यातच आता उद्धव ठाकरेंची सहानुभूतीमुळे ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्यात आले नाही. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर नार्वेकरांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपटेड, आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विधानसभा अध्यक्ष म्हणून अपात्रेच्या प्रकरणावर निर्णय घेत असताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील? हे पाहाणे माझ्यासाठी क्रमप्राप्त नव्हते. माझ्यासाठी संविधान, विधानसभा नियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश क्रमप्राप्त होते. या सर्वांचा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून कोणाचे राजकीय नुकसान झालं असेल तर त्याला विधानसभा अध्यक्षांना जबाबदार धरू शकत नाहीत. ज्या लोकांना याचे राजकीय भांडवल करायचे होते. ते दुर्दैवाने होत नसेल. त्यासाठी मी निश्चितपणे जबाबदार नाही. विधानसभा अध्यक्षांची भूमिका राजकारण सोडून असते. त्याकडे राजकीय स्कोप म्हणून पाहणे अन्यायकारक आहे. माझ्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होईल. असे वाटले होते. परंतु तसे होताना दिसले नाही. मात्र., बहुतांश लोकांकडून माझ्या निर्णयाचे स्वागत झाले. असे नार्वेकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
हेही वाचा…रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार, ‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या मुलीचा भाजप प्रवेश ठरला ?
दरम्यान, मी व्हीप ज्यांनी लागू केला. त्यांना राजकीय पक्षाचे पाठबळ होते का ? तो लागू केल्यानंतर तो सर्व आमदारांपर्यत पोहोचला आहे का ? या बाबींचे निरीक्षण केले. व्हीप लागू करण्याचा अधिकार भरत गोगावले यांना होता. त्यानुसार मी निर्णय घेतला. एखाद्या व्हीपची अंमलबजावणी किंवा त्या व्हीपच्या विरोधात मतदान झालंय ? हे त्यातून दिसून येऊ शकते. व्हीप बजावल्याची माहिती पक्षातील आमदारांपर्यंत योग्यरित्या पोहोचवली गेली पाहिजे, असेही नार्वेकर म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली
हेही वाचा“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?
हेही वाचा…शिवसेना अपात्र निकालावर राज्यात संतापाची लाट, भाजप अन् शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेणार,” संतोष बांगरांचं मोठं विधान