मुंबई : शिवसेना आमदार अपात्र निकालावरून ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. यातच आता राहुल नार्वेकर यांच्याबाबत असंसदीय शब्दाचा वापर झाला म्हणून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून निकाल दिला असल्याचे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“जब बंदूक न हुई, तब तलवार होगी,”शिवसेना प्रकरणाच्या निकालावर ‘किरण मानें’ची खणखणीत पोस्ट
यावेळी शंभुराज देसाई म्हणाले की, आमदार अपात्रता निकाल संपुर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून देण्यात आला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची हे अध्यक्षांनी सांगितले. ५४ पैकी ५० आमदार शिंदेंसोबत आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. दुसऱ्या गटात गेलो नाही. नैसर्गिक युतीत निवडून आलो असताना ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांच्यासोबत इच्छेविरोधात सरकारमध्ये सहभागी झालो. सरकार स्थापन करताना दोन-तीन हॉटेलमध्ये आम्हाला ठेवले. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचं सरकार असलं पाहिजे हे वारंवार म्हणत होते. जर मॅचफिक्सिंग असती तर १४ आमदारही अपात्र ठरवले गेले असते. असेही देसाई म्हणाले.
हेही वाचा…शिवसेनेच्या खटल्याचं क्रेडीट भाजपकडून फडणवीसांना , मग खरा पातळयंत्रणी कोण याचं उत्तर मिळतंय
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने नार्वेकरांच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यावर बोलतांना देसाई म्हणाले की, ठाकरे गटाने न्यायालयात जावं, आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू, मतं मागितली त्यांच्याच विरोधात सरकार बनवलं ही लोकशाही आहे का ? असा सवालही त्यांनी केला तर कालचा निकाल हा लोकशाहीच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे अशी टिका त्यानंतर संजय राऊतांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना अपात्र निकालावर राज्यात संतापाची लाट, भाजप अन् शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेणार,” संतोष बांगरांचं मोठं विधान
हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपटेड, आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार, ‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या मुलीचा भाजप प्रवेश ठरला ?
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपचे ‘ते’ १६४ उमेदवार ठरणार, बारामती, नागपूरसह राज्यातील अर्धा डझन जागा