मुंबई : पाच वर्षापुर्वी गुन्हा दाखल होऊन देखील अजित पवारांवर कारवाई झाली नाही. जलसंपदा मंत्री असतांना अजित पवार यांनी ७० हजार कोटी रूपयांचा घोटाळा केला. तो घोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी झाकून टाकला. तर शिखर बॅंकेतील २५ हजार कोटींचा घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना भाजपसोबत घेऊन झाल्याचा आरोप माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केलाय. त्यांनी यासंदर्भात एक पत्र देखील लिहिले आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपचे ‘ते’ १६४ उमेदवार ठरणार, बारामती, नागपूरसह राज्यातील अर्धा डझन जागा
अजित पवार यांनी माझ्याकडे पैसा कुठून येतो याची चौकशी लावली. अॅंटी करप्शनचे अधिकारी याची चौकशी करत होते. त्यांना सांगायचे आहे, मला महिन्याला चार पेन्शन्स मिळतात. यातूनच मी कोर्टातील लढाई लढण्यासाठी खर्च करत असते. मागील पंधरा वर्षात तब्बल दोन कोटी रूपयांचा खर्च केला आहे. मी माझा कारखाना सभासदांच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“जब बंदूक न हुई, तब तलवार होगी,”शिवसेना प्रकरणाच्या निकालावर ‘किरण मानें’ची खणखणीत पोस्ट
दरम्यान, शालिनीताई पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहेत. ज्यात. पुर्वीच्या जनसंघाने शिखर बॅंकेत २५ हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यातच अजित पवारांना वयाबाबत प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही. कधी रिटायर व्हायचं ते शरद पवार ठरवतील. उद्या मला देखील मी ९२ वर्षाची असल्याने वेड ठरवतील. असेही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?
हेही वाचा…शिवसेना अपात्र निकालावर राज्यात संतापाची लाट, भाजप अन् शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेणार,” संतोष बांगरांचं मोठं विधान
हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपटेड, आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार, ‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या मुलीचा भाजप प्रवेश ठरला ?