पिंपरी : गेल्या जवळपास २ वर्षांपासून देशात महामारीचं संकट थैमान घालत आहे. राज्यात देखील महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन, अनेक नागरिकांचे जीव गेले. दरम्यान, राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. लसीकरण आणि निर्बंध यामुळे हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध अजूनही पूर्णपणे हटवण्यात आले नाहीयेत.
उपमुख्यमंत्र्यांनंतर ‘अनलॉक’ बाबत राजेश टोपेंचेही सूचक विधान!
याला यावर्षीची आषाढी वारीदेखील अपवाद नाही. यावेळीही वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतिबंध घालण्यात आले. तसेच, राज्यभरातल्या मंदिरांवरही महामारीमुळे निर्बंध लागू आहेत. मात्र, असे असतानाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिकच्या नवश्या गणपती मंदिरात आरती केली असून, त्यांना सोडून त्यांच्या भोवतालच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे, भाजपने आता आक्रमक होत, जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
फडणवीसांना माझे नेते मानण्याचा विषयच नाही कारण…पंकजा मुंडेंचे पुन्हा स्पष्टीकरण
दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्र्यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली असून, पत्रकारांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी, “नियमांचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे, मग ते मंत्री असोत की सर्वसामान्य नागरिक. मुख्यमंत्र्यांनी देखील आषाढीची पूजा महामारीचे सगळे नियम पाळून केली. अशाच प्रकारे आव्हाडांनी नाशिक मधील नवश्या गणपतीची पूजा केली असेल, तर काही चूक नाही, मात्र नियम सर्वांनाच सारखेच आहेत,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.
रविवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या आव्हाडांनी, आनंदवली परिसरातील, नवश्या गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत आरती देखील केली. यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. यांनतर आनंदवली पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले, मात्र जितेंद्र आव्हाडांवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
Read Also :
- अभिष्टचिंतन : ८० तासांच्या सरकारचे दोन्ही शिल्पकार जन्मले एकाच ग्रह-मानात
- जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा! भाजपची आक्रमक मागणी
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल केल्यावरच फायदा होईल – अशोक चव्हाण
- ठाकरे सरकार उचलू शकते मोठे पाऊल! दोन डोस घेतलेल्यांना मिळणार ही सवलत
- मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेतच; भाजपाची खोचक टीका