मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, या निवडणूका स्वबळावर लढवण्याची घोषणा, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘प्रहार संघटने’ने केली आहे. नांदेडमध्ये पक्षाच्या झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षण रद्द केलेल्या ५ जिल्हा परिषदा, ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे, पक्षाची तळागाळातील ताकद समजण्यास मदत होईल. असे मत प्रहारच्या नेत्यांनी मांडले असून, हा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणूक कार्यक्रमानुसार १९ जुलैला मतदान होणार आहे, तर २० जुलैला मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली आहे
हे पण वाचा, ओबीसी नेत्यांच्या घोषणा ठरल्या फोल; आता वडेट्टीवार, बावनकुळे काय करणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालायने स्थानिक स्वराज्य संस्थांमधले ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यांनतर, राज्यात ओबीसी समाज आक्रम झाला आहे. तसेच, राज्यातील नेत्यांनी ओबीसींना हे आरक्षण मिळाले नाही, तर राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान, ओबीसी निकालानुसार राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. आता या ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक आयोगाकडून, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
हे पण वाचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय; पंकजा मुंडे म्हणतात…
२९ जून २०२१ ते ५ जुलै २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी ६ जुलै २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे ९ जुलै २०२१ पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी १२ जुलै २०२१; तर अपील असलेल्या ठिकाणी १४ जुलै २०२१ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल, असेही मदान यांनी सांगितले.
Read Also :
- ओबीसी समाजावरील अन्याय थांबवून निवडणूका रद्द करा, अन्यथा….; फडणवीस आक्रमक
- ओबीसींचे राजकीय आरक्षण न मिळाल्यास निवडणुका होऊ देणार नाही; राम शिंदे म्हणतात…
- “वडेट्टीवार-पटोले स्वतःला खरे ओबीसी नेते समजत असतील, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे”
- “ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा”
- काही नेते ओबीसी, मराठा आणि इतर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत