मुंबई : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप केल्यांनतर आणि याप्रकरणी सगळे पुरावे ईडीकडे सुपूर्त केल्यानंतर, आज ते पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार होते. मुश्रीफ यांच्या बेनामी साखर कारखान्याची माहिती ते कोल्हापूरकरांसमोर मांडणार होते. मात्र, , त्याआधीच त्यांच्या घराबाहेर राज्य सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा उभा करून त्यांना स्थानबद्ध केले आहे. यावर आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यात लोकशाही संपली? फक्त आणीबाणी घोषीत करायची राहिलीये!
दरम्यान, यावर आता भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर ‘माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील,’ असे ट्विट केले आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सोमय्या यांच्या निवास्थानी दाखल होऊन, ‘कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी समजू शकतो, पण मुंबईत बंदी का? ही सरकारची हिटलरशाही सहन करणार नाही!’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.
We strongly condemn the illegal detention of Former MP @KiritSomaiya ji & we will continue to our fight against MVA.
माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.
राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.#KiritSomaiya— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2021
कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणार!
दुसरीकडे, भाजा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही, ‘मुश्रीफांसंदर्भातील आणखी दोन प्रकरणं सोमय्या बाहेर काढणार असल्याची कुणकुण लागल्यानेच त्यांना कोल्हापूरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे,’ असा दावा करत, ‘सोमय्यांच्या घराबाहेर पोलिसांनी असा वेढा द्यायला ते काय आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी आहेत?’ असा संताप व्यक्त केला आहे. तसेच, ‘आता महाराष्ट्रात अधिकृत आणीबाणीच घोषित करायची राहिली आहे,’ असा हल्लाबोल केला आहे.
मुश्रिफांचा घोटाळा दाबण्यासाठी सोमय्यांना घरातून अटक करण्याचे आदेश?
‘राज्यात दहशतवादी, बलात्कारी उघडपणे फिरत आहेत. घातपात आणि स्फोट करण्यासाठी प्रयत्नात असलेले लोक पकडले जात असताना, भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढत असलेल्या सोमय्या यांना कोल्हापूरात येता येणार नाही, असं पोलीस सांगताहेत. राज्यात लोकशाही संपली आहे का? कोणत्या आधारावर तुम्ही त्यांना ताब्यात घेणार आहात? त्यांना थांबवल्यानं काही फरक पडत नाही, आता अधिकृतरित्या घोषीत करायची राहिलीए. ती करुन टाका. सर्वांना अटक करुन टाका. पण सत्य दाबून ठेवता येणार नाही,’ असंही ते म्हणाले.
Read Also :