मुंबई : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप केल्यांनतर आणि याप्रकरणी सगळे पुरावे ईडीकडे सुपूर्त केल्यानंतर, आज ते पुन्हा एकदा कोल्हापूरला जाणार होते. मुश्रीफ यांच्या बेनामी साखर कारखान्याची माहिती ते कोल्हापूरकरांसमोर मांडणार होते. मात्र, , त्याआधीच त्यांच्या घराबाहेर राज्य सरकारने पोलिसांचा मोठा फौजफाटा उभा करून त्यांना स्थानबद्ध केले आहे. यावर आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीटजी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला आहे.या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरत आहेत, परंतु सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ? pic.twitter.com/mgDSR410es
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 19, 2021
दिवाळीपूर्वीच देशमुख तुरुंगात जाणार, मग नंबर…सोमय्यांचा नवा दावा
दरम्यान, याप्रकरणी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुश्रीफांसंदर्भातील आणखी दोन प्रकरणं सोमय्या बाहेर काढणार असल्याची कुणकुण लागल्यानेच त्यांना कोल्हापूरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे,’ असा दावा करत, ‘सोमय्यांच्या घराबाहेर पोलिसांनी असा वेढा द्यायला ते काय आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी आहेत?’ असा संताप व्यक्त केला आहे. तसेच, ‘आता महाराष्ट्रात अधिकृत आणीबाणीच घोषित करायची राहिली आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी दिलेली प्रतिक्रिया फारच निर्भीड होती. महाराष्ट्रात जी आणीबाणी राज्य सरकारने लावली आहे, ती आता अधिकृतपणे घोषित करून टाका. सोशल मिडियावर काही लिहायचे नाही, महिलांवर अत्याचार झाले की मोर्चे काढायचे नाही, त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 19, 2021
कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणार!
‘राज्यात दहशतवादी, बलात्कारी उघडपणे फिरत आहेत. घातपात आणि स्फोट करण्यासाठी प्रयत्नात असलेले लोक पकडले जात असताना, भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढत असलेल्या सोमय्या यांना कोल्हापूरात येता येणार नाही, असं पोलीस सांगताहेत. राज्यात लोकशाही संपली आहे का? कोणत्या आधारावर तुम्ही त्यांना ताब्यात घेणार आहात? त्यांना थांबवल्यानं काही फरक पडत नाही, आता अधिकृतरित्या घोषीत करायची राहिलीए. ती करुन टाका. सर्वांना अटक करुन टाका. पण सत्य दाबून ठेवता येणार नाही,’ असं ते म्हणाले.
किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला आहे ? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का ? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचले आहे, हे जनतेला दिसत आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 19, 2021
मुश्रिफांचा घोटाळा दाबण्यासाठी सोमय्यांना घरातून अटक करण्याचे आदेश?
‘सोमय्या कोल्हापूरला जाणार! त्यांना झेड सिक्युरिटी आहे. त्यांना विरोध होणार असेल, तर ती पोलिसांची जबाबदारी आहे. ते आज गेले नाही तर उद्या कोर्टात जातील. तिथं दाद मागतील. मग कोर्ट तुम्हाला निर्णय देईल,’ असं सांगत, ‘पोलीसांनी कितीही अडवलं तरी आम्ही कोल्हापूरात जाणार आणि या सरकारविरुद्ध संघर्ष करणार आणि कितीही तोंड दाबले तरी घोटाळे बाहेर काढणारच!, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Read Also :
- राज्य मंत्री नाही, तर प्रणिती शिंदे कॅबिनेट मंत्री होणार?
- भाजपा नाराज नगरसेवक रवि लांडगे वाढवताहेत राजकीय ‘बार्गेनिंग पॉवर’
- ‘अजित पवारांचा खरा चेहरा उघडा पडला!’
- ‘चंद्रकांत पाटील अन् रावसाहेब दानवेच भाजप सोडून सेनेत येण्याची शक्यता’
- राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार