पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यावरून चागंलाच वाद सुरू झाला होता. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवारी (दि. १४) २३ गावांकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (पीएमआरडीए) ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त केल्याची अधिसूचना काढली. पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट होण्यापूर्वी या गावांचा विकास आराखडा अखेर पीएमआरडीएच करणार आहे. त्यामुळे, विकास आराखडा तयार करण्यावरून सुरू झालेल्या भाजपच्या कलगीतुऱ्याला राज्य सरकारच्या आदेशामुळे पूर्णविराम मिळाला लागला आहे.
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून २३ गावांचा घाट घातला; महापौर मुरली मोहोळांचा घणाघात
महापालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा महापालिकेने तयार करावा, असा इरादा जाहीर करण्यासाठी आणि त्यास सभागृहाची मान्यता घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने गुरुवार (दि. १५) सर्वसाधारण सभा बोलविली. मात्र, तत्पूर्वीच या गावांच्या विकास आराखड्यासाठी राज्य शासनाचा आदेश आल्याने सत्ताधारी भाजपाची गणिते बिघडली आहेत. कारण, राष्ट्रवादीच्या शहरातल्या नेत्यांनी थेट अजित पवार यांना संपर्क करून तातडीने मध्यस्थी करायची विनंती केली तर शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून भाजपची भूमिका त्यांच्या कानावर घातली. यानंतर नगरविकास विभागात तातडीने हालचाली होऊन या संदर्भातले आदेश तयार करण्यात आले आणि कॅबिनेटच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे नेले आणि तिथे या आदेशावर सही झाल्यानंतर काही वेळातच ही बातमी महापालिका वर्तुळात पसरली.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशात २३ गावांमध्ये सार्वजनिक सोयी-सुविधा विकसित झालेल्या नाहीत. या २३ गावांमधील क्षेत्र अविकसित असून, या ठिकाणचा विकास हा योजनाविरहित व अनियंत्रित स्वरूपाचा झाल्याचे सांगितले आहे. यामुळे या २३ गावांकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासच ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून जाहीर केले आहे. ही गावे अविकसित क्षेत्र जाहीर करून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० (१) (घ) नुसार आजची अधिसूचना नगर विकास विभागाने जाहीर केली.
Read Also :
- “यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षालाही मिळतात”, राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करा, मी सपोर्ट करतो; फडणवीसांची भुजबळांना राजकीय साद
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी खलबतं; महाविकास आघाडी थेट नियमच बदलणार!
- कौरव कोण?, पांडव कोण? याचं मूल्यमापन फडणवीस, पाटीलच करतील – विनायक मेटे
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?