पुणे : राज्यात अजूनही महामारीची स्थिती संपलेली नाही. राज्यात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत, अनेक पातळ्यांवर, स्तरांवर अनेक लोक काम करत होते. यातीलच एक घटक आहे, ‘आशा सेविका’. मात्र, त्यांना अत्यंत कमी असे मानधन, हे जिकिरीचे काम करण्यासाठी दिले जात आहे. ‘त्यामुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना योग्य मानधन व आरोग्य सुविधा लागू कराव्यात,’ असे पत्र किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) डॉ. रघुनाथ कुचिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
हे पण वाचा, आषाढी वारीसाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर, पाहा काय आहेत नियम
केंद्र सरकारने, तसेच राज्य सरकारने महामारीचा फैलाव रोखण्यासाठी जी मोहीम सुरु केली, त्यात आशा स्वयंसेविकांचा आणि गटप्रवर्तकांचा सक्तीने समावेश करण्यात आला. एकीकडे महामारीमध्ये काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा वेळेवर भत्ता दिला जातो. मात्र, दुसरीकडे अल्प मानधनावर काम करत असलेल्या आशा व गटप्रवर्तकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला वेळेत प्राप्त होत नसल्याने, त्यांच्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक परवड, कोंडी होत आहे.
हे पण वाचा, कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक
राज्यात महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, जेव्हा राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून, सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली. तेव्हा आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी जबाबदारीने पुढे येऊन आपले काम पार पाडले. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यभरातील ६४ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तक आता संपावर गेल्या आहेत.
हे पण वाचा, आशा कर्मचारी बेमुदत संपावर, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
त्यामुळे, महामारी काळात अत्यंत कमी मानधनात काम करणाऱ्या या स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना, योग्य ते मानधन वेळेत, तसेच आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध योजना यांचा सुकर मार्गाने लाभ मिळवता यावा, यासाठी या संवेदनशील विषयात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी, रघुनाथ कुचिक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात केली आहे. आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य आयुक्त इत्यादी सर्वांशी वेळोवेळी बैठका होऊनही अल्प मानधनामध्ये काम करत असणाऱ्या आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना आजपर्यंत योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध योजना मिळालेल्या नसल्यामुळे त्यांचे शोषणच केले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे डॉ. कुचिक म्हणाले आहेत.
Read Also :
- मराठा आरक्षण मूक आंदोलन : “सर्वांचा पाठिंबा आणि कुणाचाही विरोध नाही, तर हा पेच सुटत का नाही?”
- आमदार संजय शिंदेंच्या विरोधात अतुल खुपसेंचे बेकायदेशीर कर्जप्रकरणी पुण्यात अर्धनग्न आंदोलन
- दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभेचे उद्या १७ जून रोजी राज्यभर होणार आंदोलन
- ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
- ‘‘ज्यांच्या काळात ५८ कोटींचा घोटाळा झाला, साखरेचे पोते असणारे ट्रक चोरले गेले…’’ इंद्रजित मोहितेंची पुन्हा एकदा अविनाश मोहितेंवर टीका