सातारा : मुंबईतील साकीनाका मध्ये अमानुष अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेवर, घटनेनंतर तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. मात्र ११ सप्टेंबरला तिची प्राणज्योत मालवली. यांनतर राज्यात संतापाचा एकचं आगडोंब उसळला. दरम्यान, यांनतर अनेक नेत्यांनी राज्यातील या विकृत मनोवृत्तींना कायमचा आळा बसण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.
अनिल देशमुखांचा ठावठिकाणा लागावा म्हणून ईडीने उचलले मोठे पाऊल
या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे यांनीही, ‘स्त्री दाक्षिण्य मानणा-या माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले आहे. या घटनांना सरकार जबाबदार असले तरीही समाज आणि मानवजात देखील जबाबदार आहे. न्यायदेवता आंधळी आहे. अशा लोकांना जरब बसेल त्या शिक्षांची तरतुद आयपीसी-१८६० मध्ये करावी लागेल. त्यासाठी कायदेतज्ञांशी विचारविमर्श करुन, वेगळी दंड संहिता अस्तित्वात आणायला हवी,’ अशी मागणी करत, ‘क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा झाली पाहिजे,’ अशी भूमिका मांडली आहे.
साकीनाका बलात्कार: पीडितेच्या कुटूंबीयाला २० लाखाची मदत, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल
तसेच, ‘देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या साकीनाका परिसरातील घडलेल्या घटनेत क्रुरता-विकृती-वासनेला बळी पडलेल्या महिलेची जगण्याची झुंज आज अयशस्वी ठरली. ही घटना समस्त मानवजातीला काळीमा फासणारी अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचे दुःख, खेदही वाटतोच परंतु त्याहीपेक्षा मनस्वी संताप येत आहे. राज्यातील आणि देशातील स्त्री असुरक्षित असेल तर आपण विकासाच्या गप्पा कोणत्या धारणेवर करतो हा प्रश्न पडला आहे,’ असा सवाल त्यांनी पुरोगामींना केला आहे.
‘इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना तुमचा मुलगा काय करतो ते पाहा,’ मलिकांचा घणाघात
मुंबईतल्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.
Read Also :
- ‘बार्टीच्या योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही,’ धंनजय मुंडेंचा निर्वाळा
- मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही, ‘पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही!’
- अबब…! कागलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी काढली किरीट सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
- मोठी बातमी: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे ५ ऑक्टोंबरला मतदान, निवडणुक आयोगाची घोषणा
- ‘पक्षात नेते कमी अन् कारभारीच जास्त,’ राष्ट्रवादीला नेत्यानेच दिला घरचा आहेर