मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीती प्रमुख नेत्यांसह वंचित आणि इतर मित्र पक्षाचे नेते देखील दाखल झाले आहेत. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला या बैठकीत ठरवला जाणार आहे. त्याआधीच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सहा जागांवर दावा सांगितला आहे.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना”, डॉ. नीलम गोऱ्हे
सुरूवातीपासून वंचित महाविकास आघाडीत येण्यास इच्छूक होती. परंतु त्यावर अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. अखेर वंचितचा महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला आहे. यातच आता महाविकास आघाडीची बैठक ड्रॅायडन हॉटेलला होत आहे. या बैठकीच्या आधी वंचितने अकोल, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई. परभणी आणि अमरावती या जागांवर दावा सांगितला आहे. या जागांवर आमचा उमेदवार देऊ आणि निवडून आणू असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता वंचितला महाविकास आघाडी किती जागा सोडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“लाखांत नाही तर कोटीत निधी आणतो, तुमच्यासारखं दाळ व गुळवाल्यांच्या..,” निलेश लंकेंचा विखेंना अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, पुर्व विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघापैकी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा- गोंदिया आणि रामटेक हे पाच लोकसभा मतदारसंग आपल्याकडे ठेवण्यात कॉंग्रेसला यश आल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी भंडार-गोंदिया लोकसभा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असायचे परंतु पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीने भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ कॉंग्रेसासाठी सोडण्याची तयारी दर्शविली आहे. तर रामटेक मतदारसंघ हा परंपरेने शिवसेनेकडे असायचा. मात्र फुट पडल्यानंतर हा मतदारसंघ आता कॉंग्रेसला देण्याचा विचार सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणुक जाहीर, राजकीय गणितं कसं असणार? कोण जिंकणार ?
हेही वाचा…नवनियुक्त पोलीस आयुक्त ‘अमितेश कुमार’ यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा स्वीकारला पदभार
हेही वाचा…तुमची किळस येते शेलार, तुम्हाला मानवजन्म दिल्याचा परमेश्वरालाही पश्चाताप होत असेल राष्ट्रवादीची जहरी टिका
हेही वाचा…“संजय गायकवाडांच्या मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे”, रूपाली पाटील आक्रमक
हेही वाचा…“आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही ?” पुण्याच्या नवीन विमानतळावरून ठाकरेंचा सवाल