अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यावर अडचणीत सापडल्या आहेत. दरम्यान, त्यांनी आता न्यायालयाच्या निर्णयाविरोधात, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांनी रिव्ह्यू याचिका दाखल केली आहे. यावेळी, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे, असे सांगत त्यांनी, दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.
हे पण वाचा, उच्च न्यायालयाने दिले आदेश, खासदार नवनीत राणांवर होणार मोठी कारवाई
शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी, खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत, याचिका दाखल केली होती. ‘अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्यामुळे, त्यांनी भारतीय संविधानाचा अपमान तर केला आहेच, पण ज्या मागासवर्गीय मतदारसंघातून त्या निवडणूक लढल्या, त्या सर्व मागासवर्गीयांचाही हा अवमान आहे,’ असं मत व्यक्त त्यांनी आक्षेप घेत व्यक्त केला होता.
हे पण वाचा, नवनीत राणा यांना संसदेत बसण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही, आनंदराव अडसूळ यांची टीका
यावर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं ८ जून रोजी निकाल देत, नवनीत राणा यांना २ लाखांचा दंड सुनावला. दरम्यान, यावेळी न्यायालयाकडून त्यांना उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधा देखील गोठवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. तसेच, त्यांनी उपभोगलेल्या सगळ्या आर्थिक लाभांची देखील वसुली करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.
जात प्रमाणपत्र वैध असल्याचा दावा
आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावर, नवनीत राणा यांनी, ‘न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत, अशा न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली असून, त्या आधारावर सदर जातपडताळणी समितीने, माझे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा याआधी ३ वेळा दिला आहे. त्यामुळे, हे एक राजकीय षडयंत्र आहे. आता, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल आणि तेथे मात्र सत्याचाच विजय होईल,’ असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.
Read Also :
- ‘तुम्ही कोणतेही गुंड असा, आम्ही जिजाऊंच्या लेकी तुमच्याशी चार हात करायला सज्ज’
- ‘आम्ही तेवढ्या एकाच कारणासाठी महाविकास आघाडीत सामील’- काँग्रेस
- ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पकजा मुंडे म्हणतात…
- अजित पवारांनी केली बीड जिल्ह्याच्या मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले…
- बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा