पुणे : साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे येथे राज्यस्तरीय साखर परिषदेमध्ये शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. तर यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नितीन गडकरी यांच्यावरून शाब्दिक टोले हाणलेत.
पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?
शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भाषणं झाल्यानंतर माझं काम केवळ आभार प्रदर्शनापुरतं उरलं आहे. आम्ही शहरी बाबू आहोत, शहरी माणसांचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच मर्यादित असतो. परंतु नितीन गडकरी यांनी आता साखर उद्योगाचं आणि इथेनॉल निर्मितीचं जे भवितव्य सांगितलं ते पाहून उद्या शहारातील लोक चहाबरोबर किती साखर टाकू, हेदेखील विचारतील असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
मला साखर उद्योगातील विशेष काही कळत नाही. जेव्हा साखरेचा विषय येतो तेव्ही मी डावी-उजवीकडे पाहतो. कारण या क्षेत्रातील रथी महारथी माझ्या आजूबाजूला बसलेले असतात. त्यामुळे बाळासाहेब थोरात, अजित पवार, राजेश टोपे यांचा समावेश आहे. हे सगळे साखर उद्योगाला अडचणींमधून मार्ग काढत पुढे नेत आहेत. साखर उद्योगाच्या उडचणी दूर कऱण्यासाठी आपण निश्चित धोरण आणि रणनिती आखली पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उत्पादनात चांगले बेणं कसं देता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात येतात. यासाठी आपण काही निर्णय घेतले. ऊसाच्या नवीन जाती तयार करण्यासाठी पावलं टाकली जातात. यामध्ये आणखी वाढ करण्याची गरज आहे. मराठवाडामध्ये ऊसाचा क्षेत्र वाढते. म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तेथे एक शाखा काढावी असा एक आग्रह आपल्या सहकाऱ्यांचा होता. त्यासाठी आपण धोरणात्मक निर्णय घेतला. जालन्याजवळ पाथरवाला भागात आपण खरेदी केली. ती जमीन तयार केली. गेल्या वर्षी ११ एकर ऊस तिथे तयार केला. यावर्षी ३५ एकर ऊसाची त्या ठिकाणी लागवड केली. पाण्याची पाइपलाइन आणि बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होत आल्या आहेत. एक अतिशय उत्तम केंद्र जालन्याजवळ सुरू करत आहोत. आज आपण या ठिकाणी आहोत त्या मांजरीला ९० एकर जमीन आहे. ती शासनाकडून ३० वर्षांच्या करार करून घेतली आहे. या जमिनीमध्ये पाइपलाइनचे काम सुरू आहे. तेथील डेव्हलमेंट पूर्ण झाली. विदर्भात गोसीखुर्द धरणामुळे ओलिताखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वादळ व गारपीट या नैसर्गिक संकटांमुळे ऊस हे अधिक खात्रीचे पीक असल्याने ऊस क्षेत्रात राज्याच्या इतर भागासह विदर्भात देखील वाढ होईल. असं शरद पवार म्हणाले.
Read also:
- काश्मीर मोदींच्या हातात काळजी करू नका; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
- “गोपीचंद पडळकर सारख्या नेत्याला भाजपने आवरालं पाहिजे”; रोहित पवार
- “त्यावेळी इडीचे अधिकारी माझ्यासमोर हात जोडून उभे होते”; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
- “बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
- आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार