पुणे : जम्मू खोऱ्यात मागील काही वर्षापासून टार्गेट किलिंगच्या घटना वाढतच चालल्या आहेत. गेल्या 3 दिवसांत 3 हिंदूना दहशतवाद्यांनी ठार मारण्यात आलं. यावर्षी खोऱ्यात आतापर्यंत 26 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक या घटनांनी 90 च्या दशकातील भयानक आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
“मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना काश्मीर पंडितांची चिंता आहे. पण त्यांच्यात राज्यात राहत असलेल्या रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनांकडून नेहमची लक्ष्य केले जाते त्य़ाचे काय ? असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी राज्य सरकारला केला आहे. काश्मीर मोदींच्या हातात आहे. काळजी करू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे
या घटनांमुळे काॅंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर याप्रकरणांवरून जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले की काश्मिरी पंडितांवर आधारीत सिनेमा बघून मोदी अश्रू गाळतात. पण काश्मिरी पंडितांच्या हत्त्यांवर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, असं नाना पटोले यांनी काश्मिर मधील घटनांवरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.
“गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये हिंदुंना सातत्याने दहशतवादी लक्ष्य करताना दिसत आहेत. काश्मिरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांमुळे अनेक काश्मीर पंडितांनी गुरूवारी काश्मीर सोडलं आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदुंनी काश्मिर खोरं सोडलं आहे.
Read also:
- “गोपीचंद पडळकर सारख्या नेत्याला भाजपने आवरालं पाहिजे”; रोहित पवार
- “त्यावेळी इडीचे अधिकारी माझ्यासमोर हात जोडून उभे होते”; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
- “बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
- आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार
- पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?