पुणे : विधानसभा निवडणुका होण्याच्या अगोदर इडीची नोटीस आली होती. त्यानंतर आमच्या सहकार्यकाऱ्यांना सांगितलं की उद्य़ा इडीच्या कार्यालयात जायचं आहे. इडीच्या कार्यालयात येणार असल्याचं आम्ही त्यांना कळवलं. त्यावेळी धावून धावून इडीचे अधिकारी माझ्याजवळ येऊन हात जोडून म्हणू लागले की तुम्ही येऊ नका. त्यामुळे आपला रूपया सच्चा असल्याने आपण दडपशाहीला घाबायचं नाही असं शरद पवारांनी सांगितले.
“गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
राज्यात जाणीवपुर्वक काही लोक नव्या पीढीमध्ये धर्म वादाचा प्रचार करीत आहेत. पंरतु त्या लोकांनी कितीही काहीही केलं तरी त्यांना यामध्ये यश येणार नाही. लोकं ऐकतील आणि सोडून देतील, अंसही ते म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याबाबत प्रश्न विचाल्यावर शरद पवार यावेळी म्हणाले की, बृजभूषण मॅनेज होतील असे नेते नाहीत. त्यामुळे जे आरोप केले जात आहे. त्याला काहीही अर्थ नाही. तसेच आम्ही लोकांमध्ये राहुन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असंही ते म्हणाले.
“राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
गेल्या काही अडीच वर्षापासून महाराष्ट्रावर अनेक राजकीय संकंट आलीत परंतु कुणीही दिल्लीपुढे झुकलं नाही. हा लढणारा महाराष्ट्र असून पुढच्या निवडणुकांमध्येही भाजपने विरोधी पक्षात ठेवण्याची ताकद ठेवावी असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारचं राज्य आहे. त्याठिकाणी टार्गेट किलिंगच्या घटना घडत आहेत. त्यावरून लक्ष्य हटवायंच आणि ज्ञानव्यापी मशिद जात, धर्म या विषयाकडे वळवायचे. असं त्यांचं ठरलेलं आहे. तसेच काश्मीरमध्ये हजारो हिंदुच्या कतली सूरू आहेत परंतु त्यावर भाजपचा एकही नेता बोलत नसल्याचं राऊतांनी यावेळी म्हटलं.
Read also:
- “बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
- आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार
- पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?
- “मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे