पुणे : गेल्या काही अडीच वर्षापासून महाराष्ट्रावर अनेक राजकीय संकंट आलीत परंतु कुणीही दिल्लीपुढे झुकलं नाही. हा लढणारा महाराष्ट्र असून पुढच्या निवडणुकांमध्येही भाजपने विरोधी पक्षात ठेवण्याची ताकद ठेवावी असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
“गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
गेल्या काही महिन्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आघाडीतील अनेक नेत्यांच्या पाठीमागे लागला आहे. त्यावर बोलताना म्हणाले की, आमचे सुद्धा दिवस येणार आहेत. 2024 नंतर आम्ही त्यांना उत्तर देऊ. माझ्यासारख्या माणसाची नसलेली संपत्ती जप्त केली. कोणतीही नोटीस न देता जप्त केली त्यावेळी रात्री 12 वाजता गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला होता, असंही ते म्हणाले.
“राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
अमित शहा यांना फोन केल्यानंतर त्यांना सांगितले की, सामान्य माणसाला कशाला त्रास देता, अटक करायची असेल तर मला करा. त्यामुळे महाराष्ट्र कधीही कुणासमोर झुकला नाही. आणि झुकणार पण नाही. तो पुष्पामधला डायलॉग आहे अंसही ते म्हणाले.
“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच”; सुप्रिया सुळेंनंतर आता धनंजय मुंडे यांचाही दावा
दरम्यान, तसेच उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याबाबत प्रश्न विचाल्यावर शरद पवार यावेळी म्हणाले की, बृजभूषण मॅनेज होतील असे नेते नाहीत. त्यामुळे जे आरोप केले जात आहे. त्याला काहीही अर्थ नाही. तसेच आम्ही लोकांमध्ये राहुन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असंही ते म्हणाले.
Read also:
- आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार
- पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?
- “मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा
- “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे
- ” राज्याचे मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटतंय”; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं