पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सध्या विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सातत्याने टिका केली जात आहे. त्या टिकेला राष्ट्रवादीकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं. याच पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपनेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर ज्या पद्धतीची टिका केली होती. ती अगदी खालच्या पातळीची होती असं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले.
“मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जातीपातीचं राजकारण सुरू झालं”; प्रणिती शिंदे
गोपीचंद पडळकर जेव्हा अहिल्यादेवींच्या नावाचा वापर करतात. तेव्हा ते खालच्या दर्जाचं राजकारण करतात. धनगर समाजाच्या युवा वर्गालाही त्या गोष्टी आवडलेल्या नाहीत. ते चौंडीला अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीनिमित्त आले. तेव्हा एकछंद गोपीचंद अशा घोषणा होत होत्या. वास्तविक तिथे अहिल्यादेवी होळकरत यांच्या नावाच्या घोषणा व्हायला हव्या होत्या. असंही रोहित पवार म्हणाले.
“गडकरी साहेबांच्या सहकार्याने विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होईल”; शरद पवार
चौंडी येथील गोपीचंद पडळकर यांनी राजकीय नेत्यांवर फक्त टिका केली. नगर जिल्ह्यांच नाव बदलण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या पत्रात राजकारणच लिहिलंय. खाली एका ओळीत नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असंही ते म्हणाले.
“राज्यात तुर्तास मास्क सक्ती नाही पण..;” आरोग्य मंत्र्यांनी दिल्या महत्वाच्या सुचना
दरम्यान, गोपीचंद पडळकराचं कर्तृत्व काय हे सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावरच्या केसेस बघितल्या तर लक्षात येईल. त्यांचे ठराविक कार्यकर्ते सो़डले तर त्यांच्या आरोपांना कुणीही महत्व देत नाहीत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीही आहे. त्यामुळे मोठ्या लोकांना या लोकांना आवरलं पाहिजे. असा सल्ला देखील रोहित पवार यांनी भाजपला दिला.
Read also:
- “त्यावेळी इडीचे अधिकारी माझ्यासमोर हात जोडून उभे होते”; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा
- “बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
- आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार
- पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?
- “मरेन, तुरूंगात जाईन पण स्वाभिमान कधीच सोडणार नाही”; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा