मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी घेतली आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी बैठकांचा आणि चर्चांचा सपाटा लावला आहे.
मात्र अद्याप कोणताही तोडगा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निघालेला नाही. एसटी कर्मचारी हे मुंबईच्या आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एसटीच्या संघटनांसोबतच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठींबा दर्शविला आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील अनेक दिवसांपासून आंदोलन कर्त्यांसोबत ठाण मांडून बसले आहेत.
कबूल है, कबूल है…. मलिकांनी वानखेडेंचा टोपी घातलेला फोटो शेअर करत माजवली पुन्हा खळबळ
एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल महाविकास आघाडी प्रणित करणारे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांची भेट घेतली होती. या भेटीमधून बऱ्याच अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना होत्या मात्र कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे.यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. गेल्या ४० वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी आमचे नेते शरदचंद्र पवार यांचे जिव्हाळ्याचेसंबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?, असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला.
गेल्या 40 वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 22, 2021
नाराज विनोद तावडेंचं भारतीय जनता पक्षाकडून थेट प्रमोशन; मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
तसेच, ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील पवारांच्या उपस्थितीत स्वर्गीय. गोपीनाथ मुंडे मंजूर करून घ्यायचे. मुंडे यांना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि शरदचंद्र पवार यांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती असं देखील आव्हाड यावेळी म्हणाले.
नेत्यांनी अत्यंत जबाबदारीनेश्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवल पाहिजे. जे प्रत्यक्षअप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्द्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे, तेच काम शरद पवार करतील, अशी अपेक्षाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे
Read Also :
- सातारा जिल्हा बँकेत दोन दिग्गज नेत्यांचा निसटता पराभव; आमदार शशिकांत शिंदे, राज्य गृहमंत्री देसाई थेट पराभूत
- आमदार महेश लांडगेंची मानवता : संपकरी एसटी कामगारांच्या घरचे भरले ‘राशन’
- परमबीर सिंग भारतातच, ४८ तासांत हजर होतील; कोर्टात वकिलाचा दावा
- एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील; खासदार नवनीत राणांचा विश्वास
- शरद पवारांसोबत चार तास चर्चा केल्यानंतर एसटी संपावर अनिल परब यांचं मोठं विधान