मुंबई : शिवसेनेच्या १६ विधानसभा अपात्र आमदारांच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून शिंदे गटात गेलेल्या विधान परिषद आमदारांवर ठाकरे गट सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारी आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय होणार ? याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या बाल्लेकिल्यात ‘आदित्य ठाकरे’ निवडणुक लढविणार, लोकसभेसाठी तयारी सुरू
पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाकडून शिंदे गटातील विधान परिषदेच्या तीन आमदारांविरोधात कार्यवारी करण्याचं पत्र सचिवांना देण्यात आलं होतं. यामध्ये मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि बिप्लव बजोरीया यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली होती. मात्र हे पत्र अजूनही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे या आमदारांविरोधात कार्यवाही सुरू झालेली नाही. कार्यवाहीला विलंब होत असल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
हेही वाचा…“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
दरम्यान, पत्र देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तशा हालचाली देखील ठाकरे गटाकडून सुरू केल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली नाही. त्यांनी चार महिने वेळकाढूपणा केला. त्यामुळे ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली. त्यावेळी कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एक आठवड्याची मुदत दिली. यातच आता विधान परिषदेच्या आमदारांवरील कारवाई संदर्भातही ठाकरे गट कोर्टात धाव घेणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीत प्रवेश अन् तात्काळ ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड, उदय कुमार अहेर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…आणखी एक मनोज जरांगे पाटील..! रवींद्र टांगेंची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
हेही वाचा…तारिख ठरली..! ‘या’ दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राजकीय घडामोडींना वेग
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा
हेही वाचा…पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली