चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण देऊ नये, यासाठी बसलेल्या रवींद्र टांगे याची प्रकृती बिघडली आहे. मागील १२ दिवसापासून चंद्रपुरात ओबीसींच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू आहे. यावरून सरकारने तातडीने आपल्या प्रतिनिधींना उपोषण स्थळी पाठवावे व आंदोलन सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…पडळकरांची चुकी, तरी बावनकुळेंनी मागितली माफी, परंतु पडळकर ‘त्या’ वक्तव्यावर ठाम
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केले. त्यानंतर संपुर्ण राज्यात ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू झाले आहेत. यातच चंद्रपुरात उपोषणाला बसलेल्या रवींद्र टांगे यांची प्रकृती खालावली आहे. रविंद्र टांगे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करून उपचार घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हेही वाचा…सरकारची २६५.५४ कोटींची वसुली, अर्धे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वसनाचं काय झालं? वडेट्टीवारांचा सवाल
दरम्यान,मागील ९ दिवसांपासून रवींद्र टांगे हा तरुण ओबीसींच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करतोय. राज्यात ५२% ओबीसी आहे, मात्र सरकारला त्यांच्या मागण्यांचे आणि आंदोलनाचे गांभीर्य नाही. रवींद्र टांगे यांची प्रकृती खालावत असून सरकार ओबीसी आंदोलनाकडे अजूनही दुर्लक्ष करत आहे. सरकारने तातडीने आपल्या प्रतिनिधींना उपोषण स्थळी पाठवावे व आंदोलन सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तारिख ठरली..! ‘या’ दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राजकीय घडामोडींना वेग
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा
हेही वाचा…पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली
हेही वाचा…शिंदेंच्या बाल्लेकिल्यात ‘आदित्य ठाकरे’ निवडणुक लढविणार, लोकसभेसाठी तयारी सुरू
हेही वाचा…“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल