ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फुटीनंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यामुळे अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला लोकसभा मतदारसंघाची चाचपाणी देखील सुरू केली आहे. यातच आता ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे निवडणुक लढविणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा…“त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती..,” पहिल्यांदाच रूपाली चाकणकरांची सुळेंवर अप्रत्यक्ष टिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जात आहे. सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातील राजन विचारे खासदार आहेत. या जागेवर आदित्य ठाकरेंना तिकीट देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी ठाण्यातून निवढणूक लढणार अशी लोकांमधून चर्चा पुढे असते. त्यावर काय होतं ते आगामी काळात बघू. असं म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा…“आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले “, राष्ट्रवादीची जोरदार टिका
दरम्यान, आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली. ते अजूनही मंत्रिमंडळात आहेत. ज्या आमदाराच्या मुलाने अपहरण केलं आणि ते सीसीटीव्हीत पकडले गेले तेथे काहीही कारवाई झालेली नाही. लोकशाही आहे की, हुकुमशाही सुरू आहे? हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात आपण पाहतोय की, गद्दारांचं, गँगस्टरांचं सरकार आहे. बिल्डर-काँट्रॅक्टरचं सरकार आहे. अशी टिका देखील आदित्य ठाकरे यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…पडळकरांची चुकी, तरी बावनकुळेंनी मागितली माफी, परंतु पडळकर ‘त्या’ वक्तव्यावर ठाम
हेही वाचा…सरकारची २६५.५४ कोटींची वसुली, अर्धे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वसनाचं काय झालं? वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…“शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, आराखडा तयार करा,” अजितदादांचा पुण्यासाठी मोठा निर्णय