पुणे : ‘देशात विरोधी पक्षातील जे नेते आहेत, विशेषतः जिथे निवडणुका होत आहेत. तेथील खूप साऱ्या नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत.’ असा आरोप शिवसेने नेते संजय राऊत यांनी केला होता. त्याचविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी एक अतिशय गंभीर आरोप केला आहे. तो देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
‘महाराष्ट्रात अनेकांचे फोन टॅप होत होते. ज्यांची नावं आता या ठिकाणी आलेली आहेत आणि हे गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार ज्यावेळी होतं त्या काळात हे केलेलं आहे.’ असा थेट आरोप शरद पवार यांनी पहिल्यांदाच केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
‘मला माहिती नाही गोव्यात काय होत होतं. पण इथे फोन टॅप होत होते त्याचा सगळा रेकॉर्ड मी स्वत: बघितलेलं आहे. अनेकांचे फोन टॅप होत होते. ज्यांची नावं आता या ठिकाणी आलेली आहेत आणि हे गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार ज्यावेळी होतं त्या काळात हे केलेलं आहे.’
गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
‘लोकशाहीच्या संबंधी भयंकर आस्था असणारं, भूमिका घेणारं सरकार असताना या पद्धतीच्या गोष्टी आपण कधी पाहिल्या नव्हत्या. त्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यात अधिकाऱ्यांनाही घेतलं. त्या अधिकाऱ्यांवर खटले करण्याची वेळ आली आणि त्यांनी केवळ वरिष्ठांनी सांगितलं त्यामुळे त्यांना या गोष्टी कराव्या लागल्या. पण आता त्याची झळ या अधिकाऱ्यांना बसते आहे. ही स्थिती महाराष्ट्रात कधीही आली नव्हती.’ असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Read also:
- ठाकरे सरकारकडून राज्यपालांना टार्गेट केले जात आहे; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
- संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यापासून त्यांची ओळख, नाही तर…; गिरीश महाजनांचा टोला
- मध्यप्रदेशमधील प्रकरण टिकतयं तर, आमचंही प्रकरण टिकेल; वडेट्टीवारांची ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…