नागपूर : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या राज्यात विविध मुद्यावरून चर्चेत आहेत. राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून त्यांच्यांवर टिकेची झोड उठवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना टार्गेट केले जात असल्याचे म्हटले आहे.
आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
असवैंधानिक कृती करून राज्यपालांच्या विरोधात बोलायचं. एक प्रकारे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. राज्यपाल हे एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ती संविधानानुसारच काम करत आहे. त्यामुळे अशाप्रकारे त्यांना टार्गेट करणे अतिशय अयोग्य आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
ज्या प्रकारे सरकारने कायदे करण्याचे काम केले पाहिजे. त्याप्रमाणे त्यांच्याकडून कोणतंही काम होत नाही. तसेच जे कायदे केले जातात. ते संविधानामध्ये बसत नाहीत. त्यामुळे ठाकरे सरकार हे राज्यपालांना टार्गेट केला जात असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील बघायला मिळाले.
Read also:
- संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यापासून त्यांची ओळख, नाही तर…; गिरीश महाजनांचा टोला
- मध्यप्रदेशमधील प्रकरण टिकतयं तर, आमचंही प्रकरण टिकेल; वडेट्टीवारांची ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे