मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सातत्याने विविध मुद्यांवरून चर्चेत आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी कर न भरल्याने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर पंकजा मुंडे यांचं भाजपकडून खच्चीकरण केलं जात आहेत का ? असा सवाल आता राजकीय वर्तुळातून केला जात आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,’ असं म्हटल्यानंतर पंकजा मुंडेंचं भाजपाकडून खच्चीकरण करण्यास सुरूवात
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना २०२४ च्या निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न देणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही. “माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवत नाही? माझ्यासारख्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट न देणे हा कोणत्याही पक्षासाठी चांगला निर्णय ठरणार नाही, त्यांनी असा निर्णय घेतल्यास त्यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी नवीन मतदारसंघ शोधत नाहीये. खासदार प्रीतम मुंडे यांचीही जागाही मी घेणार नसल्याचे स्पष्ट मुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेची जंगी तयारी सुरू, अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ‘ग्रामीण संवाद यात्रा’ काढणार
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला १९ कोटी रूपयांच्या जीएसटी थकबाकीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. हा जीएसटी न भरल्यास कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचंही नोटीशीमध्ये उल्लेख केला आहे. साखर कारखान्यावर केलेले गैरव्यवहार फेटाळून लावत आपला कारखाना सध्या आर्थिक संकटातून जात असल्याचं मुंडेंनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला नासवलं, रोहित पवारांना नोटीस, काॅंग्रेसची टीका
हेही वाचा…शरद पवारांनी वळसे पाटलांच्या विरोधात डाव टाकला, वळसे पाटलांच्या ‘या’ चेल्याच दिली मोठी जबाबदारी
हेही वाचा…हाय कोर्टाचा शिंदेंना मोठा दणका, घटनाबाह्य आदेश म्हणत कोर्टाचं मोठं निरिक्षण
हेही वाचा…त्या’ प्रकारावरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन, मॅसेज, तृप्तीने मानले मनसैनिकांचे आभार
हेही वाचा…रोहित पवारांच्या दोन कंपन्या बंद होणार, १२ वाजता आली नोटीस, रोहित पवारांनी ‘या’ नेत्यांवर लावले आरोप