मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या हस्ते, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाच्या १०० खोल्यांचा ताबा टाटा रुग्णालयाकडे दिला होता. मात्र, शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबद्दलची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर, गृहनिर्माण विभागाच्या या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असून, या निर्णयावर आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली.
हे पण वाचा, प्रशांत किशोर-शरद पवारांच्या भेटीचे कोडे उलगडेना! १५ दिवसांतील तिसरी भेट
यांनतर आता, आमदार अजय चौधरी यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली असून, “कॅन्सरग्रस्तांसाठी जरी इथे जागा दिली गेली असली, तरी स्थानिकांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे, यासंदर्भात मी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावा देखील केला, त्यांना पत्रं लिहिली, त्यांच्या पीएलाही भेटलो, पण त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं”, असं आमदार अजय चौधरी यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा, “भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही”-नाना पटोले
तसेच, “माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. मी पुराव्यांशिवाय बोलत नाही. जितेंद्र आव्हाडांनी मला भेटण्यासाठी कधी वेळच दिली नाही. त्यामुळे, ज्यावेळी हा निर्णय झाला, तेव्हा स्थानिक महिलांनी म्हाडाच्या सीईओंना घेराव घातला. म्हाडाच्या निर्णयामुळे इथे राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी आणि याऐवजी भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलामध्ये किंवा अजून दुसरीकडे कुठे या इमारतीमधील सदनिका टाटा रूग्णालयास उभ्या करून द्याव्यात,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
Read Also :
- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणूकांविरोधात न्यायालयात जाणार – पंकजा मुंडे
- आघाडी सरकरमधल्या आणखी एका पक्षाने केली स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर
- ओबीसी समाजावरील अन्याय थांबवून निवडणूका रद्द करा, अन्यथा….; फडणवीस आक्रमक
- “लहान मुलांचा अभ्यास झाला नसेल, तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतंच”
- शिवसेनेने बांधले घड्याळ, राष्ट्रवादीने उचलला बाण, नव्या युतीचा मुहूर्त ठरला