मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलचं तापलं आहे. मराठा आरक्षणावरील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत उद्या संपत आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावरील सुनावणी येत्या काही दिवसात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळीआधी राज्यात वातावरण बिघडू शकतं, असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा…“एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या”, अजित पवारांनी दिले जात जनगणना करण्याचे संकेत
सरकारमधील काही लोक वेगळ्याच दिशेने भूमिका घेऊन चालले आहेत. त्यामुळे राज्यात दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकतं. मंत्री छगन भुजबळ अनेकांना हुलकावण्या देत आहेत. लोकांना भडकावताहेत. शिंदे गटातील काही लोक मराठा समाजाला ९६ कोळीचा उल्लेख करून भडकावताहेत. आम्ही कुणबी नाही, ते प्रमाणपत्र नको असं म्हणताहेत. केंद्रातील काही मराठा नेत्यांची वेगळीच भाषा आहे. मराठा समाजामध्ये या आंदोलनामध्ये सधन मराठ्यांनी रणनिती आखली आहे का ? असा सवालही संजय राऊतांनी केली आहे.
हेही वाचा…Video…! “दैवतं आपलं ठाकरे नव गाणं लॉंच”, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी
दरम्यान, राज्यात अनेक घटक आरक्षण मागत आहेत. यामध्ये धनगर, लिंगायत, मराठा समाज आणि मुस्लिम समाजाचा समावेश आहे. या सगळ्या बद्दल बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. कारण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्य प्रचंड अस्वस्थ असून राज्य सरकारने एक बैठक बोलावावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…मराठवाड्यात आघाडीच्या जागा वाटपाचा फॉम्युला ठरला? लोकसभा निवडणुकीत तगडे उमेदवार देणार
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र सुनावणीचे नवे वेळापत्रक दसऱ्यानंतर, नार्वेकर करणार पुन्हा दिल्लीवारी
हेही वाचा…जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार, मराठा आरक्षण देण्याबाबत फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“ललित पाटीलचा एन्काऊंटर करून प्रकरणाचा तपास थांबवला जाईल,” आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
हेही वाचा…जीव वाचवण्यासाठी महिला रस्त्यावर विविस्त्र धावत राहिली, भाजप आमदारांसह त्यांच्या पत्नीवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी