मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे. यातच जागा वाटपावरून मागील काही महिन्यांपासून पक्षांत अस्वस्थता पसरली आहे. अशातच आता मराठवाड्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…Video…! “दैवतं आपलं ठाकरे नव गाणं लॉंच”, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी
राज्यात पक्ष फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले, एक गट महायुतीत तर दुसरा गट महाविकास आघाडीत असून दोन्ही गट लोकसभेच्या जागा लढविणार असल्यावर शिक्कामोर्तोब झाला आहे. अशातच मराठवाड्यातील बीड आणि हिंगोलीत शरद पवार गट लोकसभा लढणार असून परभणी, धाराशीव आणि छत्रपती संभाजीनगर ठाकरे गटाला सोडणार आहे. तर नांदेड आणि लातुर विधानसभा काॅंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. फक्त जालना लोकसभेसाठी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“काम कमी आणि घोषणा जास्त..! हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत”
दरम्यान, काही दिवसापासून मराठवाड्यातील लोकसभेचा तिन्ही पक्षांकडून आढावा घेण्यात आला. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका पार पडल्या आहेत. त्यानुसार आता मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत कोणाच्या वाटेला जागा येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र सुनावणीचे नवे वेळापत्रक दसऱ्यानंतर, नार्वेकर करणार पुन्हा दिल्लीवारी
हेही वाचा…जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार, मराठा आरक्षण देण्याबाबत फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“ललित पाटीलचा एन्काऊंटर करून प्रकरणाचा तपास थांबवला जाईल,” आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
हेही वाचा…जीव वाचवण्यासाठी महिला रस्त्यावर विविस्त्र धावत राहिली, भाजप आमदारांसह त्यांच्या पत्नीवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…“एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या”, अजित पवारांनी दिले जात जनगणना करण्याचे संकेत