ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर एका रिक्षाचालकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी बाहेर ही घटना घडली आहे. हा आत्मदहनाचा प्रयत्न करणार हा शिवसेनेचा असल्याची माहिती मिळत आहे. आरटिओने रिक्षा परवाना रद्द केल्याने हताश झालेल्या रिक्षाचालकाने मुख्यमंत्र्यांच्या घरी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यात मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतील “,बड्या आमदाराचं सुचक वक्तव्य
राज्यात अशा पद्धतीच्या अनेक घटना घडत आहेत. महिलांच्या अत्याचाराचे प्रकार वाढतच चालले आहेत. वेगवेगळ्या भागात जातीय दंगलीच्या संदर्भातील प्रकार होत आहेत. महाराष्ट्रात देखील बेरोजगारी वाढतांना दिसत आहे. त्यामुळेच असे तरूण आत्महत्याचा प्रयत्न करीत आहे. तरूणांनीच अशा पद्धतीचं पाऊल उचलल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल उपस्थित होतो, असं म्हणत अजित पवारांनी या घटनांवरून राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“नगरमधील उपाध्यक्षांनी राष्ट्रवादीला ठोकला राम राम, दुय्यम वागणुक मिळत असल्याचं सांगत BRS मध्ये प्रवेश
दरम्यान, राज्यात मागील काही दिवसापासून घडत असलेल्या घटनांवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. त्यामुळे अशा घटनांना आता चाप बसणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
हेही वाचा…“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”
हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार