मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-भाजपचे सरकार आल्यानंतर अनेक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. राज्यातील अनेक भागात या घटना आता वाढतच चालल्या आहेत. यावरून जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…“नगरमधील उपाध्यक्षांनी राष्ट्रवादीला ठोकला राम राम, दुय्यम वागणुक मिळत असल्याचं सांगत BRS मध्ये प्रवेश
जयंत पाटलांनी लिहिलेल्या आपल्य पत्रात असं म्हटलं आहे की, नुकतीच कोल्हापुर येथे समाजमाध्यमातील आक्षेपार्ह छायाचित्रावरून झालेला गोंधळ, जळगाव पाळधी येथील ३१ मार्च रोजीचा प्रकार, छत्रपती संभाजी नगर येथील राम नवमी मिरवणुकीवर झालेली दगडफेक, मुंबई (मालाड मालवणी) येथे रामनवमी मिरवणूक वेळी झालेला वाद, नगर शेवगाव येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील वाद, त्र्यंबकेश्वर येथे मंदिरासमोरील संदल प्रथेवरून वाद, संगमनेर येथील लव्ह जिहाद विरुद्ध निघालेल्या मोच्यानंतर समनापूर गावात झालेली दगडफेक या अलीकडील काळात घडलेल्या घटना पाहता यामागे विशिष्ट विचार धारेचे लोक कार्यरत असल्याचे लक्षात येत आहे.
हेही वाचा…शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला, ठाकरे गटाचा शिंदे गटावर आरोप
यामागे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम जाणीवपूर्वक करण्याचा डाव असल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषनावह नाही.
हेही वाचा…*मुख्यमंत्री शिंदेंनी वाढवलं राष्ट्रवादीच टेन्शन? थेट पोहचले कट्टर अजितदादा समर्थक आमदाराच्या कार्यालयात,*
त्याचप्रमाणे मुंबई, चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात घडलेली विद्यार्थिनीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या घटनांची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करून सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे. अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार कारभार करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेस खतपाणी मिळेल. आपण ह्या घडत असलेल्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निदेश संबंधितांना द्याल अशी मला आशा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
हेही वाचा…“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”
हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यात मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतील “,बड्या आमदाराचं सुचक वक्तव्य