मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी मुंबईकरांसाठी एक वेगळाच पायंडा घातलेल्या आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या सोयी-सुविधा अबाधित राहतील की नाही ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे पगार काढण्यासाठई वापरले जायते. परंतु आता वायफळ खर्च केला जात आहे. मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीतील कोट्यावधी रुपये सुशोभीकरणासाठी, जी- २० च्या कामकाजासाठी, ट्रान्स हार्बर सेतूच्या जाहिरातबाजीसाठी वापरण्याचे निर्देश प्रशासनाकडून व राज्य सरकारकडून देण्यात येत आहे हे मुंबईकरांच्या हिताचे नाही. मुंबई महानगर पालिकेत पुढील काही वर्षे जर असेच कामकाज सुरू राहिले तर कर्मचाऱ्यांचे पगार देणेदेखील कठीण होईल अशी भीती आहे, याची राज्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यायला हवी. असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा राखीताई जाधव यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा…राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, प्रकरण काय ? वाचा सविस्तर
गेल्या दोन वर्षांत दोन लाख कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत, जाहिरातबाजीवर वायफळ खर्च करणे चुकीचे आहे. मुंबई शहरामध्ये पोस्टर्स व होर्डिंग्स लावून शहराची बकाल परिस्थिती लपवली जात आहे. मुंबईकरांच्या कर स्वरूपातील पैशांचे वायफळ खर्च होऊ नये अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. नगरसेवक पदाचे कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक मुंबईतील २२७ वॉर्ड्समध्ये नागरी सुविधांचे काम करू शकलेले नाहीत, किंबहुना आमदारांच्या व पालकमंत्र्यांच्या शिफारशी शिवाय त्यांना ते करता येत नाही. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“सर्वप्रथम राजीव गांधींनी राम मंदिर उभारण्याचा विचार ठेवला,” शरद पवारांच्या विधानावर भाजपचा पलटवार, म्हणाले…
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कारभारामुळे मुंबई शहरात नागरी सुविधांची कामे होत नाहीत. सहाय्यक आयुक्तांची गळचेपी होत आहे व प्रशासन हतबल झाले आहे. पालकमंत्र्यांची शिफारस येत नाही तोवर काम करायचे नाही असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई शहरातील काही वॉर्डांमध्ये जी कामे सुरू आहेत ते भाजप किंवा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाचे पदाधिकारी असणार तरच कामे होणार का? इतरांची कामे होणार नाहीत का? प्रशासनाने नागरी सुविधांना प्राधान्य द्यायला हवे. मुंबई शहराच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन आम्ही सहाय्यक आयुक्तांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामांची माहिती घेणार व आमचे एक डेलिगेशन आयुक्तांची यासंदर्भात भेट घेणार. असंही त्यांनी सांगितलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मोदींना पंतप्रधानपदावरून निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावं”
हेही वाचा…“खिचडी अन् कोविडमध्ये गिळालेला माल घशात हात घालून बाहेर काढा,” कारवाईनंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र…
“लाखो-करोडो रूपयाची खिचडी संजय राऊतांच्या भाऊ-बहिणीच्या खात्यावर”, भाजप नेत्याचे गंभीर आरोप
हेही वाचा….“स्वाभिमान, हिमंत , ताकद अन् सच्चा दिलाचा सुरज”, शिंदेंचा मिंधे उल्लेख करत ठाकरेंची टिका