पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला सौम्य भाषेत अन् नंतर मग अजित पवार गटाने शरद पवारांवर टिका करण्यास सुरूवात केलीय. यातच अजित पवार गटाकडून सातत्याे शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला जातो. तसेच ८३ वर्ष वय झालं त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं, असा सल्ला देखील दिला जातो. यावरून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
हेही वाचा…“सर्वप्रथम राजीव गांधींनी राम मंदिर उभारण्याचा विचार ठेवला,” शरद पवारांच्या विधानावर भाजपचा पलटवार, म्हणाले…
वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वत: पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्या हिमंत असेल तर आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो. असं म्हणत नाना पटोले यांनी अजित पवार गटाला डिवचण्याचाा प्रयत्न केलाय.
हेही वाचा…माझ्या जागी उद्या तुम्ही असाल! भावना गवळींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दरम्यान, राहुल गांधी यांची मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होत असताना कॉंग्रेसचा एक नेता शिंदे गटात नेला. अजूनही कॉंग्रेसचे नेते खेचण्याचा प्रयत्न होत असला तरी कॉंग्रेसवर त्याचा काहीही फायदा होणार नाही. जनता या नेत्यांना धडा शिकवेल. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“खिचडी अन् कोविडमध्ये गिळालेला माल घशात हात घालून बाहेर काढा,” कारवाईनंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र…
“लाखो-करोडो रूपयाची खिचडी संजय राऊतांच्या भाऊ-बहिणीच्या खात्यावर”, भाजप नेत्याचे गंभीर आरोप
हेही वाचा….“स्वाभिमान, हिमंत , ताकद अन् सच्चा दिलाचा सुरज”, शिंदेंचा मिंधे उल्लेख करत ठाकरेंची टिका
हेही वाचा…राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, प्रकरण काय ? वाचा सविस्तर