मुंबई : येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. त्यासाठी देशातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु शरद पवार २२ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर जाणार आहेत. यातच राम मंदिर व्हावे , ही सर्व भारतीयांची इच्छा आहे. पण त्याचा वापर राजकारणासाठी होत आहे. असं म्हणत सर्वप्रथम राजीव गांधी यांनी राम मंदिर उभारण्याचा विचार मांडला होता. असेही त्यांनी सांगितले. त्यावर आता भाजपकडून पलटवार केला आहे.
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, ऑडिओ क्लिप, बैठका अन् बरचं काही…
प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याची संकल्पना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती. तर त्यांना कोणी रोखले होते? त्यावेळी अडवाणींचा रथ राम मंदिरासाठी निघाला होता. तो तुमच्या इंडिया आघाडीतील लालू यादव यांनीच तर रोखला होता. त्यावेळी मंदिर का बांधले गेले नाही? असा सवाल करत राजीव गांधी यांच्या निधनानंतर २० वर्षांहून अधिक काळ केंद्रात कॉंग्रेसची सत्ता होती. तुम्ही त्यात केंद्रीय मंत्री होता. तरीही राजीव गांधई यांचे स्वप्ने का पुर्ण करू शकला नाहीत ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
तसेच राजीव गांधींच्या या स्वप्नाचा त्यांना विसर पडला असला, तरी तुम्हीही आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी म्हणून सरकारचा महत्त्वाचा भाग होतात, मग तुम्ही त्यांची आठवण का करून दिली नाही? काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी कोर्टात भगवान श्रीराम यांना काल्पनिक म्हटले होते, राम सेतूचे पुरावे मागितले होते. नाही नाही ती दुषणे रामभक्तांवर लावली, तेव्हा तुम्ही राजीव गांधींचे हे विधान त्या नेत्यांपर्यंत का पोहोचवले नाही? आता जेव्हा हे राजीव गांधींचे स्वप्न होते असे म्हणता, तर मग सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष तसेच इंडीया आघाडीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तुम्ही स्वतःही या कार्यक्रमाला येण्यास का टाळता? असा सवालही त्यांनी केलाय.
पवार साहेब, ऐ पब्लिक है, सब जानती है..!@PawarSpeaks साहेब, प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याची संकल्पना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली होती, तर त्यांना कोणी रोखले होते? त्यावेळी आदरणीय अडवाणीजींचा रथ राम मंदिरासाठी निघाला होता. तो तुमच्या इंडी आघाडीतील लालूजींनीच… https://t.co/1tSuKV1wqi
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 17, 2024
READ ALSO :
हेही वाचा…माझ्या जागी उद्या तुम्ही असाल! भावना गवळींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
“अजितदादांचा मिटकरींना दणका, घासलेटचोर स्वत:च स्पष्टीकरण देतोय,” मनसेनेही अमोल मिटकरींना डिवचलं
हेही वाचा…..म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाकारलं, कारणही दिलं, म्हणाले….
हेही वाचा“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक, मुंबईत वेगाने हालचाली वाढल्या