मुंबई : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मंदिराच्या प्रमुख गाभाऱ्यात मोदींसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्यासह काही पुजारीचं असणार आहे. यातच आता या सोहळ्याचं निमंत्रण देशातील प्रमुख व्यक्तींना देण्यात येत आहे. परंतु विरोधकांनी या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता या सोहळ्याचं निमंत्रण वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देखील मिळालं असून राम मंदिर उद्घाटन निमंत्रण नाकारल असून त्याचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…सकाळी चर्चा, दुपारी चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, सुशील कुमार शिंदे भाजपात येणार का ? पाटील म्हणाले…
प्रभू श्रीराम मंदिराचे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्येचे महासचिव चंपत राय यांनी प्रकाश आंबेडकर यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिलं आहे. परंतु हे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी नाकारलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक पत्र देखील चंपत राय यांना पाठवलं आहे. त्यात त्यांनी निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी राजकीय मोहिम म्हणून हा धार्मिक कार्यक्रम आखला गेलाय. असं म्हटले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा…“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पत्रात असं म्हटलंय की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु या कथित सोहळ्याला मी सहभागी होणार नाही. कारण, भाजप आणि आरएसएसने हा सोहळा हाती घेतला आहे. हा धार्मिक सोहळा राजकीय फायद्यासाठी राजकीय प्रचार बनवला आहे. माझे आजोबा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता की, राजकीय पक्षांनी पंथ देशाच्या वरती ठेवला तर दुसऱ्यांदा आपले स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि ते कदाचित कायमचे हिरावून जाईल.
माझ्या आजोबांनी व्यक्त केलेली भीती आज खरी ठरली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंथाला देशाच्या वरती स्थान दिले आहे. त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशा शब्दात आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातच पत्राच्या शेवटी आंबेडकरांनी जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम असा उल्लेख केला आहे.
I received an invitation for the inauguration of Ram Mandir in Ayodhya.
I will NOT be attending the said event because the event has been appropriated by the BJP-RSS; a religious event has become a political campaign for electoral gains.
My grandfather Dr. B.R. Ambedkar warned… pic.twitter.com/XmK7gjbfNf
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 17, 2024
READ ALSO :
हेही वाचा“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक, मुंबईत वेगाने हालचाली वाढल्या
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, ऑडिओ क्लिप, बैठका अन् बरचं काही…
हेही वाचा…“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत