मुंबई : कोरोळा काळात मुंबईत महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातील सुरज चव्हाण यांना ईडीने काल अटक केली. तर दुसरीकडे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या घरी आज एसीबीचे छापे पडले आहेत. रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी एबीसीने तपासकार्य सुरू केले असून दोन ते तीन ठिकाणी छापे पडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राजन साळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
माझा भाऊ, भावाची बायको, मुल, तसेच माझी पत्नी, दोन मुलं यांची व्यावसायासंदर्भात चौकशी केली. त्यांना याआधी अलिबागला जाऊन यासंदर्भात माहिती दिली होती. मला याची कल्पना होती की, ही मंडळी माझ्या घरी येतील अन् चौकशी करतील. त्यामुळे परिणाम काही होऊ, त्याची मानसिकता आहे. याची मला काहीही चिंता नाही. असे राजन साळवी यांनी सांगितले.
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये रूग्णवाहिका घोटाळा, ८ हजार कोटींचा महाघोटळा,” वडेट्टीवारांचा मोठा आरोप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मरेपर्यंत राहणार आहे. एसीबीच्या माध्यमातून कोणतीही चौकशी करू द्या. मला यासाठी तुरूंगात पाठवलं तरी त्याची मला चिंता नाही. मी यासाठी अत्यंत संयमी आहे, शांत आहे. घरी असताना रत्नागिरीचे अधिकारी त्यांनी माझ्याशी भेट घेतली अन् त्यानंतर चर्चा केली. एकाच वेळात तीन ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे १३ ते १५ अधिकारी असल्याची माहिती आहे. असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, दीड वर्षापुर्वी मला याची नोटीस आली होती. त्यावेळेपासून मला याची कल्पना होती. त्यामुळे त्याची तयारी मी करून ठेवली होती. कालपासून सर्वांचे फोन येत होते. रत्नागिरीच्या हॉटेलमध्ये, तसेच घरी आल्यानंतर माझ्या विश्वासातील माणसांकडून माहिती मिळाली. तर गुन्हा दाखल झाला तरी सगळ्या चौकशीसाठी मी समारे जाण्यासाठी तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने मला त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील राजन साळवी यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक, मुंबईत वेगाने हालचाली वाढल्या
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, ऑडिओ क्लिप, बैठका अन् बरचं काही…
हेही वाचा…“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत
हेही वाचा…सकाळी चर्चा, दुपारी चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, सुशील कुमार शिंदे भाजपात येणार का ? पाटील म्हणाले…