मुंबई : प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मासांहारी होता, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर राज्यात एव्हाना देशात मोठा वाद निर्माण झाला. भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर या विधानावरून जोरदार टिका केली. तर संपुर्ण राज्यात आंदोलने काढण्यात आलीत. यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा…शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण, आभार मानत लगावला टोला
सामाजिक संघटनांतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मंगळवारी सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती. मात्र आता सत्ताधारी आदिवासींबाबतीत भेदभाव करतात. राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला निमंत्रित करण्याचे टाळतात. सत्ताधारी महिला आणि आदिवासीविरोधी मानसिकतेचे आहेत. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनाला बोलावले नाही. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेत.
हेही वाचा…“भाजपमधून ऑफर आलीय, तुम्ही भाजपमध्ये जाणार का ?” सुशील कुमार शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
तर सामाजिक न्याय करिता आरक्षण आहे. आरक्षण म्हणजे असमानतेपासून रक्षण आहे. मंडल आयोगाने ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेताच ज्यांनी विरोध केला. ते आज ओबीसींचे रक्षणकर्ते असल्याचे भासवत आहेत. तेच लोक ओबीसींचे आरक्षण काढले जाईल. अशी भीती निर्माण करीत आहेत. अशी टिकाही त्यांनी केली.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत एक विधान केलं आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, आजही वाईट वाटतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होते. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला आहे. न्यायपालिकेतील निर्णय असे येतात की लगेच त्यातून जातीचा वास येतो. न्यायव्यवस्थेकडून हे अपेक्षित नाही. न्यायव्यवस्था निष्पक्ष असली पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण खरचं असं होतं का ? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत
हेही वाचा…सकाळी चर्चा, दुपारी चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, सुशील कुमार शिंदे भाजपात येणार का ? पाटील म्हणाले…
हेही वाचा“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
हेही वाचा..“महायुती सरकारमध्ये रूग्णवाहिका घोटाळा, ८ हजार कोटींचा महाघोटळा,” वडेट्टीवारांचा मोठा आरोप
हेही वाचा…“जर कॉंग्रेसला भाजपला हरवायचे असेल तर..,” प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीना काय सल्ला दिला ?