मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या विरोधात ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेऊन अध्यक्षांचा भांडाफोड केला. त्यानंतर लगेचच काल ठाकरे गटातील सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली. मुंबई महापालिकेत खिचडी घोटळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. तर आज ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर आय एसीबीसीने धाड टाकली आहे. त्यामुळे सरकार ठाकरे गटाचा बदला घेत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक, मुंबईत वेगाने हालचाली वाढल्या
ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी साडेतीन कोटी बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टोबर २००९ ते डिसेंबर २०२२ दरम्यान ज्ञात उत्पन्नापेक्षा ११८ टक्के जास्त बेनामी संपत्ती असून याबाबत राजन साळवी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. या प्रकरणात राजन साळवी यांच्यासह पत्नी अनुजा, मुलगा शभम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, ऑडिओ क्लिप, बैठका अन् बरचं काही…
सकाळी पावणेदहा वाजता एसीबीचे अधिकारी राजन साळवी यांच्या घरी दाखल झाले. मुळ घऱी, राहत्या घरी, तसेच भावाच्या घरी आणि एका हॉटेलवर एसीबीची धाड पडली. एसीबीचे १७ अधिकाऱ्यांकडून घरी आणि हॉटेलमध्ये झाडाझडती सुरू आहे. यातच एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र आणि इतर साहित्यांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मरेपर्यंत राहणार आहे. एसीबीच्या माध्यमातून कोणतीही चौकशी करू द्या. मला यासाठी तुरूंगात पाठवलं तरी त्याची मला चिंता नाही. मी यासाठी अत्यंत संयमी आहे, शांत आहे. घरी असताना रत्नागिरीचे अधिकारी त्यांनी माझ्याशी भेट घेतली अन् त्यानंतर चर्चा केली. एकाच वेळात तीन ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे १३ ते १५ अधिकारी असल्याची माहिती आहे. असेही ते म्हणाले.
पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, दीड वर्षापुर्वी मला याची नोटीस आली होती. त्यावेळेपासून मला याची कल्पना होती. त्यामुळे त्याची तयारी मी करून ठेवली होती. कालपासून सर्वांचे फोन येत होते. रत्नागिरीच्या हॉटेलमध्ये, तसेच घरी आल्यानंतर माझ्या विश्वासातील माणसांकडून माहिती मिळाली. तर गुन्हा दाखल झाला तरी सगळ्या चौकशीसाठी मी समारे जाण्यासाठी तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने मला त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील राजन साळवी यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सर्वप्रथम राजीव गांधींनी राम मंदिर उभारण्याचा विचार ठेवला,” शरद पवारांच्या विधानावर भाजपचा पलटवार, म्हणाले…
हेही वाचा…माझ्या जागी उद्या तुम्ही असाल! भावना गवळींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
“अजितदादांचा मिटकरींना दणका, घासलेटचोर स्वत:च स्पष्टीकरण देतोय,” मनसेनेही अमोल मिटकरींना डिवचलं
हेही वाचा…..म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाकारलं, कारणही दिलं, म्हणाले….
हेही वाचा“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती