मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालानंतर मुंबईत मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सुरज चव्हाण यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. ही कारवाई आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा….“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती
लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर. अशीच ही मिंधेंची राजवट आहे. मिंधेंसारखा निर्लज्जपणे झूकले नाहीत. म्हणूनच सुरजला सतावले जात आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी लावला आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक, मुंबईत वेगाने हालचाली वाढल्या
तसेच भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत. नाही तर प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते. स्वाभिमान, हिमंत , ताकद आणि स्वच्छ मन. सच्चा दिलाचा सुरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू. लोकशाही, सत्य, संविधान यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाचा आता आणखी एका घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत १०० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आला असून ईडीने आता त्यावर कारवाई सुरू केली आहे. कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रक्ट देण्यात आलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, प्रकरण काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“सर्वप्रथम राजीव गांधींनी राम मंदिर उभारण्याचा विचार ठेवला,” शरद पवारांच्या विधानावर भाजपचा पलटवार, म्हणाले…
हेही वाचा…माझ्या जागी उद्या तुम्ही असाल! भावना गवळींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
“अजितदादांचा मिटकरींना दणका, घासलेटचोर स्वत:च स्पष्टीकरण देतोय,” मनसेनेही अमोल मिटकरींना डिवचलं
हेही वाचा…..म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाकारलं, कारणही दिलं, म्हणाले….