मुंबई : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातील सुरज चव्हाण यांना काल ईडीने अटक केली. त्यानंतर आज ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला. याप्रकरणी एसीबीच्या १७ अधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या घरी जाऊन काही कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर कितीही चौकशा केल्या, तरी मी घाबणारा नाही. उद्धव ठाकरेंच्या सोबत कायम असणार अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली. तसेच कारवाई झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेचच राजन साळवी यांना फोन केला आहे.
हेही वाचा….“अजितदादांचा मिटकरींना दणका, घासलेटचोर स्वत:च स्पष्टीकरण देतोय,” मनसेनेही अमोल मिटकरींना डिवचलं
सकाळी पावणेदहा वाजता एसीबीचे अधिकारी राजन साळवी यांच्या घरी दाखल झाले. मुळ घऱी, राहत्या घरी, तसेच भावाच्या घरी आणि एका हॉटेलवर एसीबीची धाड पडली. एसीबीचे १७ अधिकाऱ्यांकडून घरी आणि हॉटेलमध्ये झाडाझडती सुरू आहे. यातच एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्र आणि इतर साहित्यांची तपासणी केली जात आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. म्हणाले की, राजन तुझ्या पाठीशी संपुर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे. असं राजन साळवी यांनी म्हटले.
हेही वाचा…..म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाकारलं, कारणही दिलं, म्हणाले….
ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी साडेतीन कोटी बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टोबर २००९ ते डिसेंबर २०२२ दरम्यान ज्ञात उत्पन्नापेक्षा ११८ टक्के जास्त बेनामी संपत्ती असून याबाबत राजन साळवी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. या प्रकरणात राजन साळवी यांच्यासह पत्नी अनुजा, मुलगा शभम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा….“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मरेपर्यंत राहणार आहे. एसीबीच्या माध्यमातून कोणतीही चौकशी करू द्या. मला यासाठी तुरूंगात पाठवलं तरी त्याची मला चिंता नाही. मी यासाठी अत्यंत संयमी आहे, शांत आहे. घरी असताना रत्नागिरीचे अधिकारी त्यांनी माझ्याशी भेट घेतली अन् त्यानंतर चर्चा केली. एकाच वेळात तीन ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे १३ ते १५ अधिकारी असल्याची माहिती आहे. असेही ते म्हणाले.
पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, दीड वर्षापुर्वी मला याची नोटीस आली होती. त्यावेळेपासून मला याची कल्पना होती. त्यामुळे त्याची तयारी मी करून ठेवली होती. कालपासून सर्वांचे फोन येत होते. रत्नागिरीच्या हॉटेलमध्ये, तसेच घरी आल्यानंतर माझ्या विश्वासातील माणसांकडून माहिती मिळाली. तर गुन्हा दाखल झाला तरी सगळ्या चौकशीसाठी मी समारे जाण्यासाठी तयार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने मला त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील राजन साळवी यांनी केला आहे.
READ ALSO :
“लाखो-करोडो रूपयाची खिचडी संजय राऊतांच्या भाऊ-बहिणीच्या खात्यावर”, भाजप नेत्याचे गंभीर आरोप
हेही वाचा….“स्वाभिमान, हिमंत , ताकद अन् सच्चा दिलाचा सुरज”, शिंदेंचा मिंधे उल्लेख करत ठाकरेंची टिका
हेही वाचा…राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, प्रकरण काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“सर्वप्रथम राजीव गांधींनी राम मंदिर उभारण्याचा विचार ठेवला,” शरद पवारांच्या विधानावर भाजपचा पलटवार, म्हणाले…
हेही वाचा…माझ्या जागी उद्या तुम्ही असाल! भावना गवळींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण