मुंबई : कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी काल इडीने ठाकरे गटातील सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. सुरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर सडकून टिका केली आहे. त्यावर आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…माझ्या जागी उद्या तुम्ही असाल! भावना गवळींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर. अशीच ही मिंधेंची राजवट आहे. मिंधेंसारखा निर्लज्जपणे झूकले नाहीत. म्हणूनच सुरजला सतावले जात आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी लावला आहे.
हेही वाचा….“अजितदादांचा मिटकरींना दणका, घासलेटचोर स्वत:च स्पष्टीकरण देतोय,” मनसेनेही अमोल मिटकरींना डिवचलं
तसेच भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत. नाही तर प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते. स्वाभिमान, हिमंत , ताकद आणि स्वच्छ मन. सच्चा दिलाचा सुरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू. लोकशाही, सत्य, संविधान यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यावर गरिबांची खिचडी आणि कोविडमध्ये गिळलेला माल घशात हात घालून बाहेर काढा, सुरज चव्हाण तो झांकी है, असा पलटवार भातखळकर यांनी केला आहे.
त्याचबरोबर कोविड डल्ला गॅंगची उलटी गिनती सुरू झाली आहे. घरी बसून कमावलेला माल आता तुरूंगापर्यंत नेणार हे नक्की, असा इशारा देखील भातखळकर यांनी दिला आहे. या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र…
“लाखो-करोडो रूपयाची खिचडी संजय राऊतांच्या भाऊ-बहिणीच्या खात्यावर”, भाजप नेत्याचे गंभीर आरोप
हेही वाचा….“स्वाभिमान, हिमंत , ताकद अन् सच्चा दिलाचा सुरज”, शिंदेंचा मिंधे उल्लेख करत ठाकरेंची टिका
हेही वाचा…राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, प्रकरण काय ? वाचा सविस्तर
हेही वाचा…“सर्वप्रथम राजीव गांधींनी राम मंदिर उभारण्याचा विचार ठेवला,” शरद पवारांच्या विधानावर भाजपचा पलटवार, म्हणाले…