मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टिका टिप्पणी होत आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने यावरून शिंदे गटावर खालच्या पातळीवर जाऊन टिका करतांना दिसत आहे. यावरून संजय राऊत यांच्याविरोधात आमदार संजय शिरसाठ यांनी हक्कभंग आणण्यात यावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…जामखेड बाजार समितीचा सभापती कुणाचा ? रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यामद्वारे अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. नाशिक मधील पत्रकार परिषदेत सरकारचं वैध नाहीत. त्यांचे आदेश मानू नका. असं विधान केलं. त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हे सर्व पक्ष फिरून आलेले आहेत. ते आमच्याकडेच वकिली करीत होते. त्यांना काही कळत नाही.चुकीचा निर्णय दिला तर रस्त्यावर फिरू देणार नाही. हे सर्व वक्तव्य केल्यानंतर त्यावर हक्कभंग झाल्याचं वाटत आहे. त्यामुळे आज त्यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. असं संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…निवडणुकांचा बिगुल वाजला..! महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये, फडणवीसांचे संकेत
विधानसभा हे कायदेमंडळ बनवणारं सभागृह मानले जातात. अन् विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार असतात. अध्यक्षांच्या निर्णयाला विरोध करणं हे वेगळं, परंतु त्यांना चॅलेज देणं हे काही मान्य नाही. त्यामुळे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाबद्दल हक्कभंग दाखल करून घेतलं पाहिजे. विधानसभा अध्यक्ष हा कोणत्या एका पक्षाचा नसतो. त्यामुळे राऊतांबाबत हक्कभंग दाखल करावा अशी मागणी केली असल्याचं शिरसाठांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजप इलेक्शन मोडवर..! आगामी निवडणुकांबाबत पुण्यात भाजपची रणनीती ठरणार?
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच एकच शहाणा माणूस, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी सगळेअतीशहाणे किंवा मूर्ख”
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार