मुंबई : राज्यात महाविकास आघाडीने आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागांच्या वाटपाबाबत आखणी सुरू आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तिन्ही पक्षांतील प्रत्येकी २ सदस्य अशी ६ सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे. याबाबत काल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत आगमी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. तर यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत सहा सदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात येणार असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपा मध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठी कसरत बघायला मिळण्याची शक्यात आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना अशी युती काॅंग्रेस-राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. यावेळी म्हणजे २०१९ साली काॅंग्रेस २४, राष्ट्रवादी २०, स्वाभिमानी शेतकरी, संघटना २ बविआ १ आणि नवनीत राणांसाठी १ अशी जागा सोडण्यात आली होती. तर भाजप २६ आणि शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या.
READ ALSO :
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार
हेही वाचा…जामखेड बाजार समितीचा सभापती कुणाचा ? रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
हेही वाचा…निवडणुकांचा बिगुल वाजला..! महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये, फडणवीसांचे संकेत
हेही वाचा…‘कर्नाटक पॅटर्न’ काॅंग्रेस महाराष्ट्रातही राबवणार ? निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद रूचेना..? मुळीक म्हणाले “आजही आमच्या मनात सल…”